सावंतवाडी/ प्रतिनिधी-
भारताचे माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याविषयी पत्र लिहून कळविले आहे. त्यांनी लिहिलेल्या पत्रात प्रभू असे म्हणतात, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव बघता जिल्हास्तरीय यंत्रणा कमी पडत आहे. मुंबई आणि आसपासच्या भागामध्ये कोरोनाचे रूग्ण कमी झाले. तेथील डाॅक्टरांची टीम या दोन्ही जिल्ह्यात पाठवल्यास तेथील जिल्हा व तालुका पातळीवरील आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होईल.