बेळगाव
मान्सूनचे आगमन झाले मात्र, पावसाला म्हणावा तसा जोर नाही. त्यामुळे मोठय़ा पावसाची वाट साऱयांनाच पाहावी लागत आहे. शुक्रवारपासून मान्सूनला सुरुवात झाली. शनिवारी पहाटे पाऊस झाला तरी त्यानंतर ऊन पडले. दुपारी ऊन-पावसाचा लपंडाव सुरू होता. पावसाला जोर नसल्यामुळे केवळ शिडकावा होत होता. या पावसाचा म्हणावा तसा फायदा सध्या तरी होत नसल्याचे शेतकऱयांतून सांगण्यात आले.
हवेमध्ये काहीसा गारवा निर्माण झाला आहे. मात्र, पावसाला अद्याप जोर नाही. सध्या सुरुवात झाली असून येत्या काही दिवसांत जोरदार पाऊस पडेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शेतकऱयांनी भातपेरणी केली आहे. काही ठिकाणी भाताची उगवण झाली आहे. शनिवारी अधूनमधून पावसाच्या सरी पडत होत्या.
ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पाऊस तर मध्येच ऊन पडत होते. त्यामुळे रेनकोट घालायचा की नाही, या संभ्रमात साऱयांनाच वावरावे लागले. बऱयाचवेळा केवळ शिडकावा होऊन पाऊस उसंत घेत होता. दमदार पाऊस झाला तरच पिकांना पोषक वातावरण निर्माण होणार आहे. सध्या उगवून आलेल्या भातपिकात कोळपण घालण्याच्या तयारीत शेतकरी आहेत. मात्र, दमदार पाऊस झाला तरच ते शक्मय असल्याचे सांगण्यात येत आहे.
शनिवारी झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरले होते. स्मार्ट सिटीची कामे सुरू असलेल्या ठिकाणी दलदल झाली होती. बाजारपेठेतील फेरीवाले, बैठे व्यापारी यांनाही त्रास सहन करावा लागला.