प्रतिनिधी/ रत्नागिरी
बर्ड फ्ल्यूच्या भीतीमुळे मांसाहारींनी मासळीकडे मोर्चा वळवल्याने बाजारपेठेमधील मासे 100 ते 200 रूपयांनी महागले आहेत़ तसेच थंडीलाही सुरूवात झाल्यामुळे मासळी समुद्राच्या तळाशी जात असल्यामुळे कमी सापडत आहेत़ त्यामुळे माशांचे दर वाढल्याचे मच्छीमारांनी सांगितल़े
यंदा उशीरा आलेल्या थंडीमुळे मासे खोल समुद्रामध्ये तळाशी जातात़ त्यामुळे मच्छीमारांना काही दिवसापूर्वी समाधानकारक मिळणारी मासळी दुरापास्त झाली आह़े बाजारामध्ये मासळीची आवक कमी झाल्यामुळे दर वधारले आहेत़ तसेच दरवाढ होऊनही ग्राहकांची मागणी कमी झालेली नाह़ी बर्ड फ्ल्यूच्या भीतीने ग्राहक माशांकडे वळले आहेत, अशी प्रतिक्रिया मासे विक्रेत्यांनी दिली. मासे कमी मिळत असल्याने दरवाढ होत आह़े त्यात थंडी असल्यामुळे मासळी पकडण्यासाठी अधिक कसरत करावी लागत आह़े यात सर्वाधिक भाववाढ पापलेटसह सरंगा माशांमध्ये झाली आह़े सध्या पापलेट, सरंगा 350 ते 550 रु. किलो, कोळंबी 300 ते 800, सुरमई 400 ते 700 तर बांगडा 100 ते 150 रुपये मिळत आह़े थंडीमुळे मासळी खोल समुद्राकडे वळल्यामुळे काही मासेमारी नौकांना काहीच मासळी मिळत नसल्यामुळे मच्छीमारांचा डिझेल खर्चही सुटत नसल्याचे चित्र आह़े