वेगवान वाऱयामुळे समुद्र खवळला, मासेमारी ठप्प
प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोकण किनारपट्टीवर मागील दोन दिवसामध्ये हलका पाऊस पडल्यामुळे तसेच समुद्रामध्ये वाहणारे थंड वेगवाने वारे व धुळीच्या वादळामुळे मासेमारी ठप्प झाली आह़े वारे वेगवान वाऱयामुळे समुद्र खवळल्यामुळे मासेमारी पुढील काही दिवस ठप्प राहण्याची भीती मच्छीमारांनी व्यक्त केली आह़े
पाकिस्तानमधील निघालेले धुळीचे वादळ चक्राकार वाऱयामुळे गुजरात अरबी समुद्रमार्ग कोकणकिनारपट्टीसह महाराष्ट्रात पसरले आह़े या वादळामुळे जिह्यात हलके धुळीचे साम्राज्य तसेच वातावणातील कमाल तापमानामध्ये घट झाली आह़े समुद्रामध्ये थंड वेगवान वारे वाहण्यास सुरुवात झाल्यामुळे मासेमारी करणे कठीण झाल्यामुळे मच्छीमारांनी किनारा गाठला आह़े मच्छीमारांना सध्या म्हाकूळ, बांगडा आदी मासळी मिळत होत़ी मात्र खराब हवामानामुळे मिळणारी मासळीदेखील खोल समुद्राकडे वळण्याचे मच्छीमारांनी माहीती दिल़ी गेले काही दिवस अवकाळी पाऊस, कडाक्याच्या थंडीमुळे मासेमारी करण्याचे चक्र कोलमडले आह़े त्यामुळे मच्छीमारांचे कंबरडे कोलमडले आह़े
चालू हंगामामध्ये मच्छीमारांना निर्यात योग्य मासळी मिळत असत़े म्हाकूल या मासळीला बाजारामध्ये मोठी मागणी असून या मासळीची विदेशामध्ये निर्यात देखील होत असत़े मात्र खराब हवामानामुळे मासेमारी ठप्प झाली आह़े समुद्रामध्ये वाहणाऱया वेगवान वाऱयामुळे समुद्र खवळला आह़े त्यामुळे पुढील दोन-तीन दिवस मासेमारी ठप्प राहण्याची शक्यता मच्छीमारांनी व्यक्त केली आह़े
– प्रतिक्रिया
वेगवान वाऱयामुळे मासेमारी प्रभावित झाली असल्यामुळे नौका किनाऱयावर ठेवण्यात आल्या आहेत़ सोमवारपासून हवामान प्रतिकूल झाल्यामुळे मासेमारी ठप्प झाली आह़े याचा आर्थिक फटका मच्छीमारांना बसला आह़े
– श्रीदत्त मयेकर, मच्छीमार, रत्नागिरी