वार्ताहर/ राजापूर
कोरोनाचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी शासन आणि प्रशासन शिवाय विविध सामाजिक संस्था ओरडून सांगत असताना देखील मास्कचा वापर न करणाऱयांवर राजापूर नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने कारवाई करून तब्बल साडेचार हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे.
लॉकडाऊनच्या विविध टप्प्यात देखील कडक निर्बंध असताना राजापूरच्या बाजारपेठेत सोशल डिस्टंसिगंचा पूरता बोजवारा उडत होता. आता लॉकडाऊनचे निर्बंध काहीसे शिथील झाल्याने राजापूर शहर बाजारपेठेत दररोज मोठी गर्दी होताना दिसत आहे. निर्बंध शिथील झाले असले तरी शासनाने मास्कचा वापर अनिवार्य केलेला आहे. त्यामुळे शहरात मास्क न वापरता फिरणाऱयांवर नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने दंडात्मक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.
यापूर्वी जवळपास 10 जणांवर मास्क न वापरल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करताना पाच हजार रूपये दंड वसूल करण्यात आला होता. त्यानंतर शनिवारी पुन्हा एकदा नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने कारवाईची मोहीम हाती घेताना मास्क न वापरणाऱयांकडून एका दिवसात तब्बल साडेचार हजार रूपयांचा दंड गोळा केला आहे. त्यामुळे शहरात मास्क न लावता फिरणाऱयांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.