मुंबई
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जवळपास सर्वच उद्योगांचा प्रगतीचा वेग कमालीचा खुंटला आहे. भारतात सणांना सुरूवात झाली असून सणातच मिठाईची मागणी अधिक राहत आली आहे. पण रक्षा बंधनाच्या निमित्ताने होणाऱया मिठाईच्या खरेदीला चांगला फटका बसण्याची शक्यता असून हा फटका 5 हजार कोटी रुपयांचा बसेल असा तज्ञांचा अंदाज आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाचे प्रमाण वाढल्याने लोक बाहेर कमी पडत आहेत शिवाय बाहेरच्या खाण्यावरही बऱयाचअंशी लोकांनी बंधने घातली आहेत, असे दिसून आले आहे. मागच्या वर्षी रक्षा बंधनानिमित्त देशभरात 10 हजार कोटींची मिठाई खपली होती.