ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबई, पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे देशातील लॉकडाऊन 4 मे ला संपला तरी देखील मुंबई, पुण्यातील निर्बंध 18 मेपर्यंत कायम राहण्याची शक्यता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वर्तविली आहे.
आज एका वृत्तसंस्थेशी बोलताना टोपे यांनी याबाबतचा खुलासा केला. यावेळी बोलताना टोपे म्हणाले, कोरोनाचा प्रसार रोखणे हे लॉकडाऊनचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखला जात नसेल तर आपल्याला लॉकडाऊनचा कालावधी वाढवावा लागेल.झोपडपट्टी भागात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे कंटेन्मेंट झोनची विशेष काळजी घ्यावी लागेल. मुंबई आणि पुण्यातील सध्यस्थिती पाहता आणखी 15 दिवस लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो, असे टोपेंनी सांगितले.