प्रवीण दरेकरांनी मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा
ऑनलाईन टीम / मुंबई :
माझे कुटुंब, माझी जबाबदारी म्हणणारे मुख्यमंत्री त्यांच्या कुटुंबाचंही संरक्षण करू शकले नाहीत, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे
वाढत्या कोरोना संसर्गावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर प्रवीण दरेकर यांनी निशाना साधला आहे. शनिवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी ही टीका केली आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांवरही टीका केली आहे.
- मुख्यमंत्री हतबल
ते म्हणाले, मुख्यमंत्री हतबल झाले आहेत. काय उपयायोजना करायच्या हे ते लोकांना विचारत आहेत. कोरोनाच्या संकटात जनतेला मदत काय करणार हे मुख्यमंत्री सांगत नाहीत. राज्यातील आरोग्य यंत्रणा फोल ठरली आहे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी असे मुख्यमंत्री म्हणत आहेत. पण त्यांच्या कुटुंबालाही ते सुरक्षित ठेवू शकले नाहीत. कारण सरकार संभ्रमावस्थेत आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
- इतर रज्यांपेक्षा केंद्राची महाराष्ट्राला सर्वाधिक मदत
यावेळी त्यांनी आव्हाडांवर टीका केली. आव्हाड म्हणतात 20 लाख कोटी रुपयांपैकी महाराष्ट्राच्या वाट्याला किती आले? आव्हाडांनी महाराष्ट्राच्या वाट्याला किती आले हे एकदा तपासून पाहवे. केंद्र सरकारने इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्राला सर्वाधिक मदत केली आहे. केंद्र सरकारने अन्नधान्यांपासून ते कोरोनाच्या लसीपर्यंत सर्व सुविधा महाराष्ट्राला दिल्या आहेत. त्याची आव्हाडांना कल्पना नसावी. पण आम्ही आव्हाडांना त्याची आकडेवारीच पाठवून देऊ,असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.