प्रतिनिधी/ महाबळेश्वर
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सपत्नीक तीन दिवसांच्या खासगी दौऱयासाठी येथे सायंकाळी पाच वाजता वेण्णा धरणाच्या भिंतीवर खास तयार करण्यात आलेल्या हेलिपॅडवर झाले. यावेळी गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी जिल्हय़ाच्या वतीने पुष्पगुच्छ देवुन उभयतांचे स्वागत केले. यावेळी आ. मकरंद पाटील, आ. अजय चौधरी, आ. भास्कर जाधव, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी राजशेखर यांनी ठाकरे यांचे स्वागत केले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाहण्यासाठी वेण्णालेक येथे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
निवडणूक कोणतीही असो निवडणुकीनंतर ठाकरे कुटुंब हे नेहमी महाबळेश्वर येथे विश्रांतीसाठी येत असतात. यावेळी मात्र त्यांना येता आले नाही. शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचा मुलगा विक्रांतचे लग्नग्न महाबळेश्वर येथील एव्हरशाईन या तारांकित हॉटेलमध्ये असल्याने या लग्नाच्या निमित्ताने ठाकरे कुटूंब हे महाबळेश्वर येथे विश्रांतीसाठी आले आहेत. वेण्णाधरणाच्या भिंतीवर खास हेलिपॅड तयार करण्यात आले आहे. तेथे शुक्रवारी पाच वाजता त्यांचे सपत्नीक आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी झाली. यावेळी गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी प्रथम पुष्पगुच्छ देवुन त्यांचे स्वागत केले. तसेच आ. मकरंद पाटील यांनीही त्यांचे स्वागत केले. आ. अजय चौधरी, आ. भास्कर जाघव यांनीही पुष्पगुच्छ देवुन उभयतांचे महाबळेश्वरमध्ये त्यांचे स्वागत केले.
याशिवाय जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, वन विभागाचे उपवनसंरक्षक भारत हाडा, प्रांताधिकारी संगिता चौगुले राजापुरकर, बाळासाहेब भिलारे, उपनगराध्यक्ष अफजल सुतार, माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, जिल्हा बॅकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, सभापती अंजना शिंदे, मधुसागरचे अध्यक्ष संजयबाबा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर प्रमुख दत्ताजी वाडकर, युवा शहर अध्यक्ष रोहित ढेबे, शिवसेनेचे माजी शहर प्रमुख विजय नायडू, लिलाताई शिंदे, नगरसेविका विमल ओंबळे, उज्वला तोष्णीवाल, शारदा ढाणक, श्रध्दा रोकडे आदी मान्यवरांनीही पुष्पगुच्छ देवुन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे स्वागत केले.
यावेळी हेलिपॅडवर विविध राजकिय पक्षांचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. खबरदारीचा उपाय म्हणुन वेण्णालेक येथील नौकाविहार बंद ठेवण्यात आला होता. हेलिपॅडवरून मुख्यमंत्री आपल्या वाहनाने थेट राजभवन या शासकिय विश्रामगृहावर रवाना झाले. यावेळी मोठी गर्दी झाली होती. याठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हा संपुर्ण दौरा खासगी असल्याने या तीन दिवसात ते कोणालाही भेटणार नाहीत, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने पत्रकारांना देण्यात आली आहे
मुख्यमंत्र्यांनी सुरक्षा रक्षकांना सुनावले
वेण्णाधरणावर येत असलेले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे स्वागतासाठी विविध पक्षाचे पदाधिकाऱयांची मोठी गर्दी उसळली होती. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे हेलिकॉप्टरमधुन उरताच अनेकांनी त्यांचे स्वागत करण्यासाठी त्यांच्याकडे धाव घेतलल्याने चांगलाच गोंधळ उडाला. यावेळी त्यांचे सुरक्षा रक्षक अनेकांना आवरण्याचा प्रयत्न करीत होते. महिला नगरसेविकांना व काही जेष्ठ पत्रकारांना सुरक्षा रक्षकाने अडवुन धरले होते. मुख्यमंत्री ठाकरे यांचे तिकडे लक्ष जाताच त्यांनी सुरक्षा रक्षकास चांगलेच सुनावले व त्यांना अडवु नको सोड येवु दे असे फर्मान सोडले तेव्हा सुरक्षा रक्षकांचे कडे थोडे सैल झाले. मग अनेकांना त्यांची भेट घेवुन स्वागत करता आले.