मुंबई \ ऑनलाईन टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी काल संवाद साधला. त्यावेळी, राज्यात आणखी पंधरा दिवसांचा लॉकडाऊन वाढविण्यात येत असल्याचं सांगितलं. तसेच, राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती, तेथील वैद्यकीय यंत्रणांची उपलब्धता पाहून त्या जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथील करण्याबाबत किंवा वाढविण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. त्यासाठी, जिल्हा पातळीवर आढावा घेण्यात येत आहे, असे मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत अकाऊंटवरुन ट्विटही करण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या याच निर्णयाचे उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियाचे कौतुक करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लॉकडाऊनसंदर्भातील ट्विट रिट्विट करत, उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केले आहे. पारदर्शक, कृतीशील आणि दिलासा देणारे विधान मुख्यमंत्र्यांनी केल असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांचे हेच दिलासादायक आणि व्यवहार्यपूर्ण विधान ऑक्सिजनची पूर्तता आणि टीपी रेटला धरुन आहे, असे आनंद महिंद्र यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील उद्योगपतींसोबत काही दिवसांपूर्वी कोरोनासंदर्भात व्हर्च्युअल बैठक घेतली होती. या बैठकीतील अनुभव सांगतानाही आनंद महिंद्रा यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचं कौतुक केलं होतं. सध्या देशभरातून देखील कोरोना काळात महाराष्ट्र सरकारने केलेल्या कामाचे कौतुक होत आहे.