ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भाजपच्या काळात मुस्लिमांना मानवतेची वागणूक मिळत नाही. त्यांना किडय़ामुंग्यांप्रमाणे वागवले जाते, असा आरोप आसाममधील खासदार बदरुद्दीन अजमल यांनी नरेंद्र मोदी सरकारवर केला आहे.
अजमल म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखालील सरकार मुस्लिमविरोधी आहे. ते मुस्लिमांना भारतीय नागरिक मानत नाही. या सरकारच्या काळात त्यांना मानवतेची वागणूक मिळत नाही. किडय़ामुंग्यांप्रमाणे वागवले जाते. भाजपाने आपल्या धोरणांनुसार सर्व ठिकाणी हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न केले आहेत. त्यामुळे त्यांचे हे धोरण फार काळ चालेल, असे मला वाटत नाही. आता देश त्यांच्या हातात आहे. तर त्यांनी तो व्यवस्थित चालवावा. नाहीतर उद्या देश दुसऱया कोणाच्यातरी हातात जाईल, असेही ते म्हणाले.