रस्ते मोकळे असल्याने कुत्र्यांचा वावर वाढला : नागरिकांवर कळपाने हल्ला करण्याचे प्रकार; महानगरपालिकेने त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
सध्या शहर परिसरात सर्वत्र मोकाट कुत्र्यांची दहशत ही गंभीर बाब बनली आहे. रस्ते मोकळे असल्याने कुत्र्यांचा वावर वाढला आहे. मात्र, कुत्र्यांचे कळप सामान्य जनतेला भयभीत करत आहेत. अलीकडेच नरगुंदकर भावे चौक येथे कुत्र्यांनी पाच जणांचा चावा घेतला होता. त्यातील दोन महिलांना इंजेक्शनसाठी सिव्हिल
हॉस्पिटलपर्यंत जाणेही कठीण झाले होते.
वडगाव बाळकृष्णनगर, यरमाळ रोड येथेही भटक्मया कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. जेथे जावे तेथे कुत्री मागे लागतात. घरांच्या पायऱयांवर किंवा लिफ्टच्या दारात बसून राहतात. त्यामुळे ये-जा करणे कठीण होत आहे.
मंडोळी रोड स्कायपार्क, सृष्टी अपार्टमेंट या ठिकाणीसुद्धा कुत्र्यांचा वावर वाढला आहे. असंख्य कुत्री येथे मोकाट फिरत असतात. मुख्य म्हणजे या कुत्र्यांची भीती तर आहेच, परंतु रात्री त्यांचे भुंकणे इतके वाढते की झोपेचे खोबरे होते. हटकण्यास गेल्यास कुत्री अंगावर येत आहेत. त्यामुळे त्यांच्यापासून दूर पळताना नाकीनऊ येतात.
मोकाट कुत्र्यांची समस्या बेळगावला कायमची आहे. नागरिकांनी याकडे वारंवार प्रशासनाचे व आरोग्य खात्याचे लक्ष वेधले तरी कोणतीच उपाययोजना होत नाही. कुत्र्यांच्या हल्ल्यात लोक नाहक जखमी होत आहेत. कोरोनामुळे सिव्हिलमध्ये जाऊन रेबीजचे इंजेक्शन घेणेही कठीण होत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी यरमाळ रोड, बाळकृष्णनगर, शिवगणेश कॉलनी, वड्डर वसाहत, टिळकवाडी, नरगुंदकर भावे चौक येथील नागरिकांनी केली आहे.
रात्रपाळीवरून घरी परतणाऱयांना अधिक धोका
शहर आणि उपनगरांमध्ये भटक्मया कुत्र्यांमुळे डोकेदुखी वाढत चालली असून दररोज नव्या समस्या नागरिकांसमोर निर्माण होत आहेत. शहरातील विविध रस्त्यांवर भटक्मया कुत्र्यांनी हैदोस घातला असून घराबाहेर पडणाऱया प्रत्येक व्यक्तीच्या अंगावर धावून जावून चावा घेण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे या भटक्मया कुत्र्यांना आवरणार कोण? असा मुद्दा निर्माण झाला आहे. परिणामी वाहनधारकांना रस्त्यावरून ये-जा करणे मुश्कील बनले आहे.
सध्या कोरोनामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त आहेत. यामुळे अन्य समस्यांकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ मिळेनासा झाला आहे. मात्र लॉकडाऊनच्या कालावधीत जवळजवळ सगळीकडेच मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. मोकाट कुत्र्यांच्या कळपाने हल्ले करण्याचे प्रकारही वाढले आहेत. विशेषतः रात्रपाळी करून रात्री उशिरा घरी जाणाऱया वाहनधारकांच्या तसेच सायकलस्वारांच्या अंगावर धावून जात आहेत. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य खात्याने तात्काळ भटक्मया कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
बाजारपेठेसह शहरातील विविध परिसरात मटण आणि चिकन दुकानांची संख्या जास्त आहे. तेथील मांस-हाडे परिसरातील कचरापुंडीमध्ये टाकली जातात. यामुळे यावर ताव मारण्यासाठी भटकी कुत्री या परिसरात ठाण मांडून असतात. रात्रीच्यावेळी कर्कशपणे ओरडण्याबरोबरच नागरिकांवर हल्ला करण्याचे प्रकार घडत आहेत. मांसाहार खाण्याची चटक लागलेली भटकी कुत्री नागरिकांवर हल्ला करीत
आहेत. त्यामुळे भटक्मया कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.