अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ गनी यांनी रविवारी देश सोडला आहे. त्यानंतर तालिबानने अध्यक्षांच्या भवनावर कब्जा केला आहे. यानंतर गनी यांनी देशाच्या नागरिकांसाठी पत्ररुपी संदेश दिला आहे.
प्रिय देशवासीयांनो,
शस्त्रास्त्रांनी युक्त आणि अध्यक्ष भवनात शिरू पाहणाऱया तालिबानचा सामना करण्यासाठी उभा राहू का, ज्याच्या रक्षणासाठी 20 वर्षे खर्च केले असा देश सोडून जाऊ असा प्रश्न माझ्यासमोर आज होता. तालिबानशी लढण्याचा पर्याय निवडला असता तर अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला असता. काबूल आमच्या डोळय़ांसमोर उद्ध्वस्त झाले असते. या 60 लाख लोकसंख्या असलेल्या शहरात मोठे मानवी संकट पहावे लागले असते. मला मार्गातून हटविण्याचा निर्धार तालिबानने केला आहे. काबूल आणि काबूलच्या लोकांवर हल्ला करण्यासाठी तालिबान येथे आले आहे. या रक्तपाताला रोखण्यासाठी मीच येथून जाणे योग्य होते. तालिबानने तलवारी आणि बंदुकांसोबत हे युद्ध जिंकले आहे आणि आता लोकांची अब्रू, संपत्ती आणि स्वाभिमानाचे रक्षण करण्याची जबाबदारी तालिबानची आहे. तालिबानने लोकांची मने जिंकलेली नाहीत. देशाची जनता, विविध विभाग, भगिनी आणि महिलांना मन जिंकण्याचा विश्वास देणे आवश्यक आहे. मी नेहमीच स्वतःच्या लोकांची सेवा करत राहणार आहे.
अफगाणिस्तान जिंदाबाद