कामुर्लीसह अनेक ग्रामसभांमध्ये म्हादईसाठी ठराव संमत : केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या राजीनाम्याची मागणी
प्रतिनिधी /पणजी
म्हादईच्या प्रश्नावऊन गोव्यातील ग्रामसभा तापल्या असून काल रविवारी झालेल्या कामुर्लीच्या ग्रामसभेने तर अमित शहा यांच्या वक्तव्यावर निषेध नोंदवला आणि गोवा भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. रविवारी वीसहून अधिक ग्रामसभांमध्ये म्हादईचे पाणी वळवण्यास विरोध करणारे ठराव ग्रामसभेत संमत करण्यात आले असून ते सावंत सरकारला तसेच शहा यांना पाठवण्यात येणार आहेत.
म्हादईचे पाणी वळवण्याचे पडसाद आता ग्रामसभेतून उमटू लागले आहेत. कोरगांवच्या ग्रामसभेने म्हादईचे पाणी वळवण्यास विरोध कऊन तसा ठराव संमत केला. केरी ग्रामसभेने म्हादई बचावासाठी ठराव मंजूर केला असून जनजागृती करण्याकरीता विशेष समिती स्थापन केली आहे. वेलिंग-प्रियोळ पंचायतीने देखील म्हादईचे पाणी वळवण्यास आक्षेप घेतला असून पाणी वळवण्यास विरोध करणारा ठराव संमत केला आहे. बोरी, दुर्भाट – आडपई, बांदोडा, सुर्ला, चिखली ग्रामसभांमध्ये म्हादईबाबत ठराव संमत करण्यात आले आहेत.
कामुर्ली ग्रामसभेत शहांचा निषेध
कामुर्ली ग्रामसभेत अमित शहा यांनी कर्नाटकातील सभेत केलेल्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेऊन गोवा सरकारवर जोरदार टीका केली आहे. चिखली ग्रामसभेतही म्हादईचे पाणी वळवण्यास विरोध करणारा ठराव मंजूर केला आहे. ग्रामसभेतून हा विषय पोहोचल्याने ग्रामीण भागातही म्हादईचा प्रश्न उभा राहीला असून एकंदरीत जनतेचा तीव्र विरोध असल्याचे समोर येत आहे. शहा यांच्या विधानामुळे तर गोव्यात खळबळ माजली असून राजकीय स्वार्थासाठी म्हादईचा सौदा कऊन ती विकल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहांनी सावंत सरकारला पाडले उघडे
सावंत सरकार आणि मंत्रीगण केवळ विरोधाचे नाटक करीत असून गोवा सरकारच्या संगनमताने म्हादईचे पाणी वळवण्यात आल्याचे शहा यांनी उघड केल्यामुळे सावंत सरकारचे पितळ आता उघडे पडले आहे. इतरही ग्रामसभांतून म्हादईच्या विषय गाजण्याची शक्यता असून हा प्रश्न आता ग्रामीण पातळीवर जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
काही दिवसापुर्वी गोव्यातील भाजपचे काही मंत्री, आमदार, खासदार यांनी अमित शहा यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली होती. तेव्हा शहा यांनी फक्त निवेदन स्विकाऊन कोणताही शब्द न देता त्यांना माघारी हात हलवत गोव्यात पाठवले होते. तेव्हा शंकेची पाल चुकचुकली होती. विरोधी आमदारांनी त्याबाबत संशय व्यक्त केला होता आणि तो आता खरा ठरल्याचे समोर आले आहे.
सुनावणीची तारीख अंदाजे : कार्लुस परेरा
म्हादई प्रश्नावरील सुनावणी येत्या 13 फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी ती तारीख अद्याप यादीत समाविष्ट झालेली नाही. ती जोपर्यंत यादीत समाविष्ट होत नाही तोपर्यंत सुनावणी होणार याची खात्री नसते, असा दावा काँग्रेसचे आमदार कार्लुस परेरा यांनी केला आहे.
परेरा हे पेशाने वकील असून ते गेली अनेक वर्षे त्या व्यवसायात आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार कोणत्या दिवशी कोणत्या याचिका सुनावणीला येणार याची यादी अगोदर सर्वोच्च न्यायालयाकडून जारी करण्यात येते. म्हादईची याचिका जेव्हा तारखेसह यादीत समाविष्ट होईल आणि ती वेबसाईटवर प्रसारीत करण्यात येईल तेव्हाच त्या सुनावणीची खात्री देता येऊ शकते. त्यामुळे 13 फेब्रुवारी ही तारीख अंदाजे आहे, असे ते म्हणाले.
अमित शहांकडून न्यायालयाचा अवमान
म्हादईच्या पाणी वाटपाचा प्रश्न न्यायप्रविष्ट अर्थात सर्वोच्च न्यायालयात असताना ते पाणी संगनमताने कसे काय वळवण्यात आले? आणि तो प्रश्न सुटला असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कसे काय सांगू शकतात? अशी विचारणा जनमानसातून सुऊ झाली आहे. केंद्रीय जल आयोगाने कर्नाटकच्या डीपीआरला मंजूरी दिली आहे, त्यास गोवा सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेले असताना पाणी वळवणे आणि ते जाहीरसभेत मुक्तपणे सांगणे हे शहा यांना शोभत नाही. म्हणजेच त्यांनी न्यायालयाची प्रतिक्षा न करता राजकीय स्वार्थासाठी म्हादईचा बळी दिला आहे. हा प्रकार म्हणजे न्यायालयाचा अवमान असल्याची टीका शहा यांच्यावर सुऊ झाली आहे.
म्हादई लोकचळवळ यशस्वी करूया : सेव्ह गोवा सेव्ह म्हादई’ची जनतेला हाक,‘नायलॉन 6-6’ प्रमाणे चळवळ उभारण्याचा इशारा
गोव्याची अस्मिता, माता म्हणून जिचा आम्ही सन्मान, आदर करतो त्या म्हादई नदीतील पाण्याला केंद्रातील भाजप सरकारने कर्नाटकच्या घशात उतरवले आहे. राज्यातील भाजप सरकारही गेंड्याच्या कातडीप्रमाणे वागत असल्याने आता म्हादईच्या अ]िस्तत्वासाठी आणि तिला वाचविण्यासाठी गोमंतकीयांनीच म्हादईची लोकचळवळ हातात घेऊन एकत्र येण्याची हीच खरी वेळ आहे. त्यासाठी गोमंतकीयांनी म्हादईला वाचविण्यासाठी आता सर्व हेवेदावे विसरून संघटित होऊन केंद्राला आणि कर्नाटकला आमची ताकद दाखवून देण्यासाठी जनतेने एकत्र यावे, अशी हाक ‘सेव्ह गोवा’ या चळवळीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे.
पणजी येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला सेव्ह गोवा या चळवळीचे प्रमुख महेश म्हांबरे, हृदयनाथ शिरोडकर, प्रजल साखरदांडे व तनुज अडवलपालकर उप]िस्थत होते.
महेश म्हांबरे म्हणाले, दिल्लीश्वरांनी मुख्यमंत्री सावंत यांना जे काही सांगितले आहे, ते आता गोव्यातील जनतेसमोर सत्य सांगावे, अन्यथा राजीनामा देऊन घरी बसावे. येत्या काही दिवसांतच गोव्यातील जनतेला एकत्र करून आम्ही लोकचळवळ काय असते ते दाखवून देऊ, असा इशाराही म्हांबरे यांनी दिला.
हृदयनाथ शिरोडकर म्हणाले, मुख्यमंत्री प्रमोद सावंत व सरकारातील सर्व मंत्री, आमदार हे सर्वजण म्हादईचे पाणी कर्नाटकला वळविण्याबाबत जबाबदार आहेत. आपली सत्ता, पद टिकविण्यासाठी केंद्रापुढे भक्कम बाजू मांडण्यास गोव्यातील सरकार कमी पडल्यानेच अमित शहा यांनी बेळगाव (हुबळी) येथे गोवा सरकारच्या संगनमताने कर्नाटकला पाणी वळविले असल्याचे कबूल केले आहे. यावरूनच भाजप सरकार गोमंतकीय जनतेच्या भावनांशी खेळत असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे आता ही लढाई लोकांची असून, लोकांनीच आता म्हादईला वाचविण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन शिरोडकर यांनी केले.
श्रीपाद नाईक यांनी प्रथम राजीनामा द्यावा
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनीच पहिल्यांदा राजीनामा द्यावा. कारण म्हादईवर घाला झाल्यास आपण आपल्या पदाचा राजीनामा देईन, असे नाईक यांनी गोमंतकीय जनतेला आश्वासन दिले होते. त्यांनी गोमंतकीय जनतेसोबत म्हादईला वाचविण्यासाठी लोक चळवळ उभी करण्यासाठी स्वत: पुढाकार घ्यावा, असे आवाहन तनुज अडवलपालकर यांनी केले.
आता म्हादईला वाचविण्यासाठी प्रखर लढाईची गरज आहे. त्यासाठी लोकांनी स्वत: पुढे येऊन प्रत्येक गोमंतकीयांनी घरातून बाहेर पडून नायलॉन 6-6 प्रमाणेच लोकचळवळ उभी राहण्यासाठी पुढे यावे. अन्यथा प्रखर विरोध केल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाही, असा इशारा प्रजल साखरदांडे व इतरांनी सरकारला दिला.
जीवनदायिनीचा सत्तेसाठी सौदा गोव्याच्या इतिहासातील काळा दिवस
आम आदमी पक्षाची मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका
प्रत्येक वेळी ’भिवपाची गरज ना’ अशा शब्दात दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी म्हादईच्या बाबतीत मात्र गोमंतकीयांचा विश्वासघात केला असून एकप्रकारे सत्तेसाठी स्वमातेचा सौदा केला आहे, अशा कठोर शब्दात आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रतिमा कुतिन्हो यांनी टीका केली आहे.
खुद्द सरकारनेच सत्तेसाठी जीवनदायिनीचा सौदा करणे हा गोव्याच्या इतिहासातील ’काळा दिवस’ असल्याचे त्यांनी नमूद केले. दुर्दैव म्हणजे अमित शहा यांनी म्हादईसंबंधी वक्तव्य करून 24 तास उलटले तरीही भाजपमधील एकही मंत्री, आमदार किंवा त्यांचे पदाधिकारी यांनी अवाक्षरही काढलेले नाही यावरून म्हादई विकण्याच्या या पापात त्या सर्वांचा सहभाग आहे, असे गृहित धरावे का? असा सवाल कुतिन्हो यांनी उपस्थित केला.
रविवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्यावेळी वाल्मिकी नाईक आणि सर्फराज यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना त्यांनी, मुख्यमंत्र्यांनी स्वत:ची खुर्ची सांभाळण्यासाठी म्हादईचा बळी दिला, असा आरोप करताना म्हादईप्रश्नी गृहमंत्री अमित शहा बोलले ते खरे की मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे वक्तव्य खरे मानावे?, असे त्या म्हणाल्या.
श्रीपाद नाईकनी राजीनामा द्यावा
म्हादईप्रश्नी यापूर्वी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी राजीनामा देण्याचे वचन दिले होते. आता त्यांनी राजीनामा देऊन ते सत्य करून दाखवावे, असे आव्हान कुतिन्हो यांनी दिले. म्हादईसाठी रस्त्यावर उतरून लढा देण्याची हीच वेळ असून ’आता नाही तर कधीच नाही’ अशी सध्यस्थिती असल्याचे त्या म्हणाल्या.
यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. परंतु एकही विरोधी आमदार उपस्थित राहिला नव्हता. त्या विषयाचा बाऊ करताना मुख्यमंत्री, विरोधकांना म्हादईबद्दल प्रेमच नाही, अशा शब्दात टर उडवत होते. परंतु आता अमित शहा यांनीच, ’गोवा सरकारला विश्वासात घेऊनच म्हादईचा पाणी वाद मिटवला’, असे विधान करून मुख्यमंत्र्यांची पोलखोल केली आहे. अशावेळी विरोधकांना टार्गेट करण्याचा नैतिक अधिकार त्यांना राहिलेला नाही. त्यामुळे जे विरोधक बैठकीला गेले नव्हते ते सच्चे होते व म्हणुनच अभिनंदनास पात्र आहेत, असे कुतिन्हो म्हणाल्या. म्हादईप्रश्नी कोणत्याही लढ्यास आम आदमी पक्ष सदैव आघाडीवर असेल व सर्व विरोधक तसेच स्वयंसेवी संस्था-संघटना, यांच्या सोबत राहील असेही त्यांनी स्पष्ट केले.