ऑनलाईन टीम / मुंबई
नागपूरमध्ये जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुक जाहीर झाली असुन निवडणूक जवळ येईल तसे एकमेकांवर ताश्चर्य ओढणे आता सुरु झाले असुन या प्रचारादरम्यानच नागपूर – रामटेकचे अपक्ष आमदार आशीष जयस्वाल यांनी या प्रचारादरम्यान उद्धव ठाकरेंनी सरकारमध्ये समावेश केल्याने मेलेल काँग्रेसवाले जिवंत झाले असं खळबळजनक वक्तव्य केले आहे. राज्यातील दोन्ही काँग्रेसला हा टोला लगावला असून या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत पुन्हा कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.जयस्वाल हे अपक्ष असले तरी ते शिवसेना समर्थक आमदार आहेत. २०१९ मध्ये रामटेक मतदारसंघात अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवली होती.
यावेळी आशीष जयस्वाल “हे काँग्रेसचे लोक मेले होते तुम्ही, तुम्हाला कोणी विचारत नव्हतं. उद्धव ठाकरेंनी तुम्हाला सरकारमध्ये घेतलं म्हणून हे मेलेलं लोक जिवंत झाले. नाहीतर यांच्या दोन्ही पक्षांमध्ये अशी गळती लागली होती. की कोण ही विचारायला तयार नव्हते. सर्व दुसऱ्या पक्षात जायला तयार होते. हे सर्व मेलेले लोक जिवंत झालेले आहेत. हे मी उघडपणे सांगतो,” असे आशीष जयस्वाल यांनी म्हटले आहे.
आशीष जयस्वाल यांच्या या वक्तव्यामुळे दोन्ही काँग्रेसमधील या वक्तव्याला कसे प्रतिउत्तर देतात हे पाहणे उत्सूकतेच ठरणारे आहे. तसेच शिवसेना खासदार संजय राऊत ही या प्रकरणात नेमकी काय भुमिका बजावताना जयस्वाल यांच्या वक्तव्याचे समर्थन करतात कि जयस्वाल यांनाच उपदेशाचे डोस पाजतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.