म्हैसाळ वार्ताहर
म्हैसाळ योजनेचे २०२१-२२ चे उन्हाळी आवर्तन आज पासुन सुरू करण्यात आले असून योजनेचा जिल्ह्यातील सहा तालुक्यातील गावांना लाभ होणार असल्याची माहिती जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली.
म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे एकूण लाभक्षेत्र ८१६९७ हे. असुन सांगली जिल्ह्यातील मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव व जत या चार तालुक्यातील ७१६९७ हे. इतके तसेच सोलापूर जिल्ह्य़ातील सांगोला व मंगळवेढा या दोन तालुक्यातील १०००० हे. लाभक्षेत्र आहे. या अगोदर ऑगस्ट-सप्टेंबर २०२१ मध्ये २.५० टीएमसी कृष्णा नदीच्या पुराचे पाणी उचलून योजनेच्या लाभ क्षेत्रातील तालुक्यातील सर्व तलाव भरून देण्यात आले होते. त्याचा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ झाला.
२०२१-२२ चे उन्हाळी आवर्तन सुरु करण्यासाठी जलसंपदा विभागाकडून पाणी मागणी अर्ज जमा करण्याबाबत तसेच गावोगावी अभियान राबविण्यात आले होते. यास अनुसरून २०२१-२२ उन्हाळी आवर्तन आज पासून सुरू करण्यात आले. याचा लाभ क्षेत्रातील सर्व ६ तालुक्यातील गावांना होणार आहे.