प्रतिनिधी / बेळगाव
स्मार्ट सिटीच्या दृष्टिकोनातून शहराची वाटचाल सुरू आहे. मात्र, दुसरीकडे शहरातील कचऱयाची समस्या डोकेदुखी ठरत आहे. पश्चिम भागातून शहरात प्रवेश करणाऱया यंदे खुट मार्गावरील कचऱयाची उचल होत नसल्याने अस्वच्छता निर्माण झाली आहे.
शहरातील महत्त्वाच्या मार्गावर आणि शहराच्या प्रवेशद्वाराजवळ कचरा साचून असल्याने शहराच्या सौंदर्याला बाधा पोहोचत आहे. येथील कचऱयाची वेळेत उचल होत नसल्याने कचरा सर्वत्र विखुरला जात आहे. परिणामी परिसरात अस्वच्छता निर्माण होऊन दुर्गंधी पसरत आहे. स्मार्ट शहरातील कचऱयाची समस्या सुटणार कधी? असा प्रश्न सर्वसामान्यांतून उपस्थित होत आहे.
सतत गजबजणाऱया यंदे खुट मार्गावर अनेक फेरीवाले, हातगाडीवाले आहेत. हे व्यावसायिक शिल्लक राहिलेल्या टाकावू वस्तू या ठिकाणी टाकतात. त्यामुळे कचऱयात वाढ होत आहे. शिवाय भटकी जनावरे कचऱयात फिरत असल्याने कचरा रस्त्यावर विखुरला जात आहे. या मार्गावर शाळा व कॉलेज असल्याने विद्यार्थ्यांबरोबर प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या मार्गावर सतत ये-जा असते. त्यामुळे रस्त्याशेजारी असलेल्या कचऱयाच्या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. सदर रस्त्यावरील कचऱयाची त्वरित उचल करून स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.