प्रतिनिधी/ बेळगाव
येळ्ळूर येथील 16 वे येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन रविवारी आयोजित करण्यात आले आहे. परमेश्वरनगर येथील नेताजी मराठी सांस्कृतिक भवन येथे दोन सत्रांमध्ये संमेलन होणार आहे. संमेलनाध्यक्ष ज्ये÷ पत्रकार अनिल आजगावकर तर उद्घाटक अशोक नाईक यांच्या उपस्थितीत कै. वाय. बी. चौगुले संमेलननगरीत संमेलन होणार आहे.
संमेलनाची सुरुवात प्रथेप्रमाणे ग्रंथदिंडीने होणार आहे. परमेश्वर मंदिरपासून संमेलनस्थळापर्यंत ग्रंथदिडी काढण्यात येईल. पहिल्या सत्रात उद्घाटन, स्वागताध्यक्षांचे भाषण, उद्घाटक भाषण व त्यानंतर अध्यक्षीय भाषण होणार आहे. यावेळी विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. दुसऱया सत्रात कारदगा येथील प्रकाश काशीद यांचा हास्यकल्लोळ हा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर त्याच सत्रात क्रांतिसिंह नाना पाटील हा एकपात्री प्रयोग प्रा. डॉ. नवनाथ शिंदे सादर करणार आहेत. या संमेलनाला साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन साहित्य संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे यांनी केले आहे.
पाहुण्यांचा परिचय
अनिल आजगावकर (संमेलनाध्यक्ष)
अनिल आजगावकर यांनी इतिहास विषयातून एमएपर्यंतचे शिक्षण घेऊन अनेक दैनिकांमध्ये लिखाण केले आहे. विविध विषयांवर त्यांनी बेळगावसह परिसरात व्याख्याने दिली आहेत. ते भारतीय कम्युनिस्ट पक्ष बेळगाव शाखेचे सदस्य, प्रगतशील लेखक संघाचे सदस्य, मजदूर को-ऑप. सोसायटीचे संचालक, जीवन विवेक प्रति÷ानचे विश्वस्त, कॉ. कृष्णा मेणसे पुरोगामी व्यासपीठ समितीचे सदस्य म्हणून काम करत आहेत. त्यांचा अनेक राजकीय, सामाजिक, महिला व कामगार विषयक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग राहिला आहे.
प्रकाश काशीद
कारदगा साहित्य विकास मंडळाचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांचा ‘झाले मोकळे आकाश’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय या क्षेत्रांचे 27 पात्रांच्या माध्यमातून एकपात्री विनोदी प्रयोगाचे एक हजारहून अनेकवेळा सादरीकरण केले आहे. त्यांना राज्यस्तरावरील एकपात्री अभिनयाची अनेक पारितोषिके मिळाली आहेत.
प्रा. डॉ. नवनाथ शिंदे
प्रा. डॉ. नवनाथ शिंदे हे बीड जिल्हय़ातील असून आजरा महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सेवा बजावून निवृत्त झाले आहेत. मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढा, अंधश्रद्धा व जटानिर्मूलन कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग होता. आजरा महाविद्यालयात कमवा व शिका ही योजना त्यांनी सुरू केली. आदिवासी मुलांसाठी वसतिगृह चालविणे, दुष्काळग्रस्तांसाठी हौद बांधून त्यांनी मोफत पाणी पुरवठा केला आहे. संत गाडगेबाबा, शहीद भगतसिंग, गौतम बुद्ध, महात्मा फुले, प्रबोधनकार ठाकरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर एकपात्री प्रयोग सादर केले आहेत.