पावसामुळे-खरेदी करणाऱयांनी पाठ फिरविल्याने शेतकऱयांनी घेतला निर्णय
प्रतिनिधी / बेळगाव
येळ्ळूरसह परिसरातील वाळलेल्या गवताला (पिंजर) याला मोठी मागणी असते. इतर तालुक्मयांबरोबरच महाराष्ट्रातील शेतकरीही गवत खरेदी करण्यासाठी दरवषी येत असतात. चांगला दरही मिळतो. मात्र यावषी खरेदीदारांनी पाठ फिरविली आहे. याचबरोबर दमदार पाऊस झाल्यामुळे शिवारातील गवतगंज्या खराब झाल्या होत्या. त्यामुळे शेतकरी आता गवत विस्कटून शेतामध्ये पेटवून देत आहेत. बऱयाचवेळा जनावरांना चारा मिळत नाही. त्यामुळे चाऱयासाठी धावाधाव करावी लागते. मात्र यावषी चारा मुबलक झाल्यामुळे शेतकऱयांवर चारा पेटवून देण्याची वेळ आली आहे.
जनावरांचा चारा मिळणे देखील कठीण असतो. तर अनेकवेळा त्याचे दर गगनाला भिडलेले असतात. गेल्या काही वर्षांमध्ये शेतकऱयांनी अधिक दराने वाळलेले पिंजर विकले होते. मात्र काही एजंटांनी आणि काही अतिउत्साही शेतकऱयांनी पिंजराचे दर अधिकच सांगितल्यामुळे ते सर्वसामान्य शेतकऱयाला परवडणारे नाहीत. त्यामुळे येळ्ळूर परिसराकडे चारा खरेदी करण्यास येणाऱयांनी पाठ फिरविल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
बरेच शेतकरी शेती करताना त्याला जोडधंदा म्हणून जनावरे पाळतात. मात्र जनावरे देखील आता पाळणे अवघड झाले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱयांनी जनावरे पाळणेच बंद केले आहे. त्यामुळे चारा खरेदी करणाऱयांची संख्या देखील कमी झाली आहे. बैलजोडय़ा तर फारच कमी झाल्या आहेत. याचबरोबर दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरीही कमी झाले आहेत. त्यामुळे चारा खरेदी करण्याची संख्या देखील कमी झाली आहे.
दर अधिक असल्यामुळे चंदगड तालुक्यातील शेतकरी माघारी
शिवारातून ट्रक्टरमधून जो चारा नेऊन गावाशेजारी रचावा लागतो. त्यासाठी मनुष्यबळही अधिक लागते. त्यामुळे दुग्धव्यवसाय परवडणे अवघड झाले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये बैलहोंगल, कित्तूर, सौंदत्ती, खानापूर या परिसरातून पिंजर खरेदीसाठी अनेक जण येत होते. याचबरोबर महाराष्ट्रातील शिनोळीसह चंदगड तालुक्मयातील अनेक गावातील शेतकरी येत होते. मात्र अधिक दर येळ्ळूर परिसरातील शेतकरी सांगत आहेत म्हणून खरेदी करणाऱया शेतकऱयांनीं पाठ फिरविल्यामुळेच आता चारा पेटवून देण्याची वेळ आल्याचे बोलले जात आहे. एकूणच शेतकऱयाला मोठा फटका बसला आहे.