प्रतिनिधी/रत्नागिरी
गेल्या दोन दिवसात रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना संशयित रुग्णांची संख्या वाढत असून आज पुन्हा 2 रूग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिश्रा यांनी दिली आहे.
आता नव्या रुग्णांची संख्या 4 वर पोचली आहे. त्यामुळे रत्नागिरीकर चांगलेच धास्तावले असून मुंबईकरांना रत्नागिरी आणण्याचा प्रशासनचा निर्णय चुकीचा तर नाही ना याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. याआधी 6 रुग्ण होते आता 4 असे 10 रुग्ण झाले आहेत. येत्या काही दिवसात हा आकडा आणखीन वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.