प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नव्या निर्बंधामुळे अत्यावश्यक सेवा वगळता जिह्यातील सर्व दुकाने व हॉटेल्स बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने जाहीर करण्यात आला आहे. मात्र या आवाहनला रत्नागिरी शहर व परिसरात काही दुकाने बंद तर अनेक दुकाने चालूच’ असल्याचे चित्र मंगळवारी दुपारी उभे होते. पण सायंकाळी प्रशासनाच्या कारवाईच्या बडग्याने उर्वरितही दुकाने बंद झाल्याचे चित्र निर्माण झाले. पण नव्या निर्बंधाविषयी व्यापारी वर्गात जोरदार खदखद याद्वारे दिसून येत आहे.
कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे नव्या निर्बंधानुसार पुढील आठवडाभर शहरातील तसेच तालुक्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवावी लागणार आहेत. मंगळवारी प्रशासनाकडून रिक्षा फिरवून तसेच प्रत्यक्ष न.प.कर्मचारी व पोलीस यांच्यामार्फत दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यामुळे यादिवशी व्यापाऱयांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. शहरातील काही व्यापाऱयांनी मंगळवारी दुपारी हळूहळू दुकाने बंद करण्यास सुरुवात केली.
या बैठकीनंतर प्रशासनाकडून रिक्षा फिरवून दुकाने बंद करण्याचे शहरात आवाहन करण्यात आले. तसेच रत्नागिरी नगर परिषदेच्या कर्मचारी व पोलिस यांच्या पथकामार्फतही व्यापाऱयांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. मंगळवारी दुपारी पेलेल्या आवाहनाला व्यापारी संघटनेने प्रतिसाद देत हळूहळू दुकाने बंद करण्यास सुरुवात केल्याचे दिसून आले. त्यामुळे दुपारपासून रामआळी, राधाकृष्ण नाका, गोखलेनाका, बसस्थानक, आठवडाबाजार, मारूतीमंदिर आदी बाजारपेठेतील दुकाने बंद झाल्याचे चित्र निर्माण झाले. बंद दुकाने होताच बाजारात आलेल्या नागरिकांची गर्दीही ओसरल्याने रस्त्यावरील वर्दळही कमी झालेली होती. रत्नागिरी शहराबाहेरही यादिवशी सायंकाळनंतर दुकाने बंद करण्याकडे व्यापाऱयांनी प्रतिसाद दिल्याचे चित्र होते.