प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यात मागील 8 दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आह़े हवामान खात्याकडून जिह्यात पुढील 3 दिवसांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आह़े जिल्हा प्रशासनाकडून सर्व विभागांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ तर नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आह़े
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या 3 दिवसांत संपूर्ण कोकण किनारपट्टीवर विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आह़े रविवारी जिह्याच्या काही भागात पावसाने जोरदार बॅटिंग केल़ी खेड येथील जगबुडी नदी रविवारी इशारा पातळीच्या वर वाहत होत़ी त्यानुसार नदीकाठच्या रहिवाशांना प्रशासनाकडून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले होत़े तसेच नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ झाल्यास राहण्यासाठी पर्यायी व्यवस्थाही प्रशासनाकडून करण्यात आली आह़े
जिह्यात बहुतेक ठिकाणी खरीपाची शेती पूर्ण होत आली आह़े भातशेती ही जवळपास 80 टक्क्यांहून अधिक ठिकाणी पूर्ण झाली आह़े तर नाचणी, वरी आदी लावणीची कामेही पूर्ण होत आली आहेत़ जुलै महिन्याच्या सुरूवातीला जिह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे लावणीच्या कामांना वेग आला होत़ा नंतरच्या काळात पावसाने उघडीप घेतल्याने उर्वरित कामांमध्ये अडथळा निर्माण झाला होत़ा दरम्यान पुन्हा एकदा पावसाने जोर पकडल्याने येत्या काही दिवसात 100 टक्के शेतीची कामे पूर्ण होणार आहेत़
रत्नागिरी जिह्यातून जाणाऱया मुंबई-गोवा महामार्गाचे काम होत असल्याने रस्त्याकडेचा भाग खणून ठेवण्यात आला आह़े मागील दिवसांत पडलेल्या पावसामुळे पर्शुराम घाट बंद ठेवण्यात आला होत़ा सध्या या घाटातील वाहतूक दिवसा सुरू ठेवण्यात आली असून रात्री बंद ठेवण्यात आला आह़े पुन्हा एकदा पावसाने जोर पकडल्यास 30 जुलैपर्यंत रात्रीसाठी बंद ठेवण्यात आलेली वाहतूक आणखी काही काळ वाढवली जाणार असल्याचे बोलले जात आह़े