राजापूर : पूर ओसरल्यानंतर सुरू असलेली साफसफाई
वार्ताहर / राजापूर
राजापूर तालुक्यात गेले दोन दिवस मुसळधारेने कोसळणाऱया पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने शहरातून वाहणाऱया अर्जुना आणि कोदवली नद्यांच्या पुराचे पाणी काही पमाणात ओसरले आहे. मात्र मंगळवारीही कोदवली नदीचे पाणी जवाहर चौकातील स्तंभापर्यंत होते. तर वरचीपेठ, शीळ रस्ताही पाण्याखाली आहे. त्यामुळे पुराचा धोका कायम आहे. सोमवारी अर्जुना व कोदवली नदीच्या पुराच्या पाण्याने शहराला वेढा दिला होता. कुशे मेडीकलपर्यंत पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. छत्रपती शिवाजीपथ, बंदरधक्का, वरचीपेठ रस्ता, गुजराळी रस्ता पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूकही बंद होती. दरम्यान सोमवारी सायंकाळनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने पूर ओसरण्यास सुरूवात झाली होती.
उन्हाळेतून तरूण बेपत्ता
राजापुरात भरलेल्या पुराच्या पाण्यात एकजण वाहून गेल्याची घटना समोर आली होती. या पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचा अद्याप शोध लागलेला नाही. उन्हाळे येथील सहदेव खेमाजी सोड्ये (40) सोमवारपासून बेपत्ता असल्याची नोंद पोलीस स्थानकात झाली आहे अतिवृष्टीत अर्जुना धरणाचा सुमारे 1 किमी लांबीचा उजवा कालवा वाहून गेला आहे. कालव्याचे पाणी व माती शेतकऱयांच्या शेतात पसरल्याने मोठे नुकसान झाले.
दापोली तालुक्यातील उन्हवरे, फरारे, दाभोळमध्ये घरात शिरले पाणी
दापोली : तालुक्यातील माटवण येथील देव्हारी नदीला पूर आल्याने गावातील भातशेती अशी पाण्याखाली गेली आहे.
दापोली : कोळथरे भागात जोरदार झालेल्या पावसाने कोळेश्वर मंदिराकडे जाणारा पूल असा पाण्याखाली गेला होता.
दापोलीत गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोसळणाऱया पावसामुळे उन्हवरे येथील 6, तर फरारे येथील 7 घरांमध्ये खाडीला आलेल्या पुरामुळे पाणी शिरले. मात्र कोणत्याही प्रकारे नुकसान झालेले नसल्याचे तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले. तसेच दाभोळ गावातील काही घरांमध्ये पुराचे पाणी शिरले असल्याचे समोर आले आहे. पुंभवे येथील रावजी कुळे व सतीश काष्ठे यांच्या घरावर शेवग्याचे झाड पडून अंशत: नुकसान झाले.
खेडमध्ये पूर ओसरला
खेड : दापोली मार्गावर सुर्वे इंजिनिअरिंगनजीक नारिंगी नदीचे पाणी घुसल्याने ठप्प झालेली वाहतूक. रात्रीपासून पावसाने विश्रांती घेतल्याने पूरस्थिती ओसरताच नदीकाठच्या रहिवाशांसह नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. मात्र पुन्हा सकाळपासून पावसाने थैमान घातल्याने जगबुडी व नारिंगी नदीची धोक्याची पातळी कायमच होती. नारिंगी सभोवतालचा परिसर जलमय होऊन भातशेती पुन्हा पाण्याखाली गेली. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाची संततधार सुरूच होती. चिपळुणात नदीकाठच्या भागात घुसले पुन्हा पाणी पेठमाप, नाईक कंपनीजवळील घरे, दुकानात पाणीच पाणी, सतर्पतेमुळे नुकसान नाही, पावसाची संततधार कायम, नद्या तुडुंब, मुरादपूर रस्ता पाण्याखाली गेल्याने रल्वेस्टेशनकडे जाणारा मार्ग पडला बंद.
चिपळूण : वाशिष्ठी नदीच्या पाण्याने नाईक कंपनीजवळच्या दुकानांमध्ये शिरलेले पाणी.
चिपळूण : शहरातील मुरादपूर येथील रस्ता असा पाण्याखाली गेल्याने रेल्वे स्टेशनकडे जाणारा मार्ग बंद पडला आहे.
बाजारपेठेत शुकशुकाट
चिपळुण पावसाचा जोर वाढला असल्याने गेल्या दोन दिवसांपासून बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनामुळे आधिच संकटात असलेले व्यापारी आणखीनच अडचणीत आले आहेत.