नवी दिल्ली
वर्ष 2024 च्या अगोदर देशातील रस्ते अपघातांची संख्या आणि त्यामध्ये होणाऱया मृत्यूचे प्रमाण 50 टक्क्यांनी कमी करण्याचे ध्येय निश्चित केले असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. देशामध्ये रस्ते अपघातात जवळपास प्रतिवर्षाला 1.5 लाख लोक आपला प्राण गमावतात. तसेच देशामध्ये 22 लाख चालकांची कमतरता असून सरकार 2,000 ड्रायव्हिंग स्कूल सुरु करण्यासोबत अपघात आणि त्यामधून होणाऱया मृत्यूमध्ये 50 टक्क्यांनी कमी करण्याचे ध्येय सरकार निश्चित करणार असल्याचे उद्योग संघटना फिक्की यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मंत्री गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.