प्रतिनिधी/ बेळगाव
रंग हे चैतन्याचे मनोहारी प्रतीक आहे. या रंगांचा वापर करून दिवाळीमध्ये घरोघरी आणि रस्तोरस्ती कलात्मक अशा रांगोळय़ा रेखाटल्या जातात. रांगोळी हे शुभचिन्ह आहे. रंगवल्ली या संस्कृत शब्दावरून त्याची पुढे रांगोळी अशी ओळख झाली. रांगोळीचा समावेश 64 कलांमधील एक महत्त्वाची कला म्हणून केला आहे. तिसऱया शतकात धान्याचा उपयोग करून रांगोळी काढली जात असे. तर सातव्या शतकात पंचरंगी चुरणे, धान्ये, फुले आणि फुलांच्या पाकळय़ा, पाने यांचा वापर करून रांगोळी काढली जात असे.
माहिती कोषातील संदर्भानुसार इ. स. 10 व्या शतकामध्ये उत्सवप्रसंगी घरापुढे रांगोळी काढली जात असे. आकृती प्रधान व वल्लरी प्रधान हे रांगोळीचे मुख्य प्रकार. बिंदू, रेषा, कोन, वर्तुळ, त्रिकोण, चौकोण अशा भूमित्यांच्या आकृत्यांचा वापर करून प्रामुख्याने महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर भारत-दक्षिण भारतात मुख्यत्वे अशी रांगोळी काढली जाते. दक्षिण भारतात गाठीच्या रांगोळय़ांनाही अधिक महत्त्व आहे. फुले, पत्री, वृक्षवल्ली, पशुपक्षी यांच्या आकृत्यांना प्राधान्य देणारी रांगाळी म्हणजे वल्लरी प्रधान रांगोळी. बंगाल, ओडिसा, बिहार येथे काढली जाते.
अलीकडे रांगोळय़ांना अतिशय महत्त्व आलेले आहे. प्रत्येक वारानुसार देवापुढे आणि घरासमोर रांगोळी काढली जाते. आज सर्वत्र टेबलावर बसून जेवण्याची पद्धत आली असली तरी खास सण, समारंभाला पंगतीसमोर रांगोळी काढण्याची पद्धत आजही आहे. रांगोळीचे भारतीय संस्कृती आणि कलेशी दृढ नाते आहे. लोककलांमध्ये विकसित झालेली वारली कला ही याचाच एक भाग आहे. यज्ञ, होम करताना सभोवती रांगोळी रेखाटणे ही प्रथा पुराण काळापासून आहे.
रांगोळी ही प्रतिकात्मक
रांगोळी काढण्याचे प्रकार जसे वेगळे आहेत, तसे प्रांतानुसार त्याचे नावही वेगळे आहे. बंगालमध्ये अल्पना, बिहारमध्ये अलिपन, राजस्थानमध्ये मांडवा, उत्तर प्रदेशात चौकापुर्णा, महाराष्ट्रात व कर्नाटकात रांगोळी, आंध्रप्रदेशात मुग्ग्गु, केरळमध्ये पुविडल व तामिळनाडूमध्ये कोलम या नावाने ती ओळखली जाते. रांगोळी ही प्रतिकात्मक असून त्यामध्ये प्रामुख्याने पूर्वीच्या काळी चंद्र, सूर्य, तारे, पशु, पक्षी, पौराणिक देवदेवता, शंक, चक्र, गधा, पद्म, स्वस्तिक अशी शुभचिन्हे प्रतिकात्मकरित्या रेखाटली जात.
पूर्वीच्या काळी शिरगोळय़ाच्या शुभ्र चुर्नापासून रांगोळी बनविली जात असे. कोकणात भाताची भोलपटे जाळून त्याची पांढरी राख रांगोळी म्हणून वापरली जात असे. तांदुळ पिठीसुद्धा रांगोळी म्हणून वापरली जात असे. आजमात्र रांगोळीचे स्वरुप आमुलाग्र बदलले. घरापुढचे अंगण हळूहळू विस्मृतीत चालले असून फ्लॅटमध्ये उपलब्ध जागेमध्येच रांगोळी काढण्याची हौस महिला भागवून घेत आहेत. मात्र येथे आकाराने लहान रांगोळी रेखाटावी लागते. त्यामुळे मोठय़ा रांगोळी काढण्याची हौस ही रस्त्यावरती रांगोळी काढून भागवली जाते.
गाठीच्या रांगोळय़ा या दिसायला अत्यंत सुंदर आणि तितक्मयाच कलात्मक असून त्या सहजी जमतील असे नाही. काही ठराविक घरांसमोर मात्र जुन्या, जाणत्या महिला अशा रांगोळय़ा काढताना दिसतात. रेषा जोडवून रांगोळी कितीही मोठी विकसित करता येते. हाच प्रकार संस्कार भारती रांगोळीच्या बाबतीतही होतो. बिंदू, वर्तुळ आणि रेषा यांच्या माध्यमातून संस्कार भारती कितीही मोठय़ा आकारात वाढवता येते. या रांगोळीमध्ये रंग भरण्यास मुक्त वाव असतो. मात्र बारीक रेषा हे रांगोळी काढण्याचे कौशल्य मानले जाते.
रस्त्यावर सहसा संस्कार भारती किंवा मुक्त हस्ते म्हणजेच फ्री हॅण्ड रांगोळय़ा रेखाटल्या जातात. रंगीबेरंगी रांगोळय़ा लक्षवेधी ठरतात. आता मात्र रांगोळीने एक परिवर्तनच घडवून आणले आहे. नोकरदार महिलांकडे असणारा कमी वेळ लक्षात घेत आता रांगोळीचे छाप, रांगोळीचे पेन, रांगोळीचे प्लास्टिकचे नमुने, स्टिकर अशा अनेक साधनांनी रांगोळी रेखाटण्यात येते. प्लास्टिकच्या छोटय़ा डब्यांच्या झाकणावर स्वस्तिक, ओम, लक्ष्मीची पावले, दिवा यांचे छाप मारण्यात आले असून वेळ कमी असणाऱया महिलांसाठी हे छाप साहाय्यभूत ठरले आहेत. मात्र ज्यांच्याकडे भरपूर वेळ उपलब्ध आहे अशा महिला आणि प्रामुख्याने युटय़ूबवर आपल्या रांगोळय़ा रेखाटणाऱया महिला रांगोळीसाठी असंख्य घरगुती साधनांचा उपयोग करताना दिसत आहेत. यामध्ये आईस्क्रीमचे, घरातील खाण्याचे चमचे, डब्यांची झाकणे, चाळणी, टुथपिक, उदबत्ती अशा सर्वांचा वापर करून रांगोळी काढत असल्याचे पहायला मिळते. कोलम, मंगलम या नावानेसुद्धा रांगोळय़ा पहायला मिळतात.
रांगोळी सध्या राजस्थान, गुजरात येथून मागविली जाते. पांढऱया शुभ्र रांगोळीमध्ये रंग भरून रेखाटली जाणारी रांगोळी हे जीवनाच्या रंगीबेरंगी पैलुंचेच एक उदाहरण होय. याचबरोबर पाण्यावरची, तेलावरची रांगोळीही रेखाटली जाते. तबकाला कुंकू किंवा तबक समईच्या वातीवर धरून त्यावरही रांगोळी काढली जाते. मात्र जुन्या, जाणत्या महिलांना त्याचा अनुभव आहे.
नव्यापिढीचा फुलांची रांगोळी काढण्यावर अधिक भर
नवपिढी ही फुलांची रांगोळी काढण्यावर अधिक भर देते. त्याचबरोबर फ्री हॅण्ड म्हणजे मुक्तहस्त रांगोळी ही आजच्या तरुण मुलींसाठी अधिक आवडती आहे. धान्यांची रांगोळी हा रांगोळीचा आणखी एक प्रकार. कापसाच्या माळा करून त्यातूनही रांगोळी रेखाटली जाते. कितीही आधुनिकता आली तरी रांगोळी देव घरापासून बाहेरच्या जगापर्यंत आपले अस्तित्व अबाधित ठेवून आहे.
सध्या शहरात सर्वत्र रंग आणि रांगोळी विपेते बसले आहेत. गल्लोगल्ली याचे स्टॉल लागले आहेत. दहा रुपयाला चार ग्लास किंवा दहा रुपयाला एक पाकीट असा दर आहे. ज्यांना शक्मय आहे ते विपेते रस्त्यावर रांगोळी रेखाटून लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत. दरवषी बेळगावमध्ये 40 टनहून अधिक रांगोळीची विक्री होते.
शुभसंकेत देणारी रांगोळी
रांगोळी त्यातील विविध रंगांमुळे डोळय़ांना सुखद ठरते. त्यातील बिंदू आणि रेषा जीवनातील स्थिती आणि लय सुचित करतात. रांगोळीतील सुचिन्हे आणि प्रतिके आपल्याला आध्यात्मिक, सामुहिक, वैचारिक जीवनाचे मर्म सांगतात. रांगोळी हा एक सौंदर्याचा आणि रंगांचा उपचार आहे. पाहताक्षणीच मन उल्हसित करणारी, शुभसंकेत देणारी आणि आजच्या कोरोनामुळे आलेल्या उदासिनतेला दूर करणारी रांगोळी म्हणूनच महत्त्वाची आहे.