मागील वषीच्या तुलनेत तीन फुटाने जास्त पाणीपातळी : जूनअखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा
प्रतिनिधी /बेळगाव
शहरवासियांना तीन ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर काही भागाचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. राकसकोप जलाशयामधील पाणीसाठा मागील वर्षाच्या तुलनेत तीन फुटाने जास्त आहे. मात्र पाणीपुरवठा नियोजन कोलमडल्याने शहरवासियांना पाणी टंचाईची झळ सोसावी लागत आहे. मुबलक आणि जून मध्यावधीपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक असताना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
सध्या शहरात पाण्याची टंचाई भासत असून एलऍण्डटी कंपनीकडे पाणी पुरवठय़ाची जबाबदारी देण्यात आल्यापासून शहराच्या पाणी पुरवठय़ाचे नियोजन कोलमडले असल्याची टिका नागरिक करीत आहेत. राकसकोप जलाशयातील पाणीसाठा कमी झाल्यास पाणी पुरवठय़ात कपात करण्यात येत होती. पण सध्या राकसकोप जलाशयामध्ये मुबलक पाणीसाठा असूनही शहर आणि उपनगरात पाणी टंचाईची झळ बसली आहे. अपुऱया पाण्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करण्याची वेळ आली आहे.
यंदा उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले आहे. तसेच शहरातील काही भागात पाण्याचा दुरुपयोग होत आहे. यामुळे राकसकोप जलाशयामधील पाणीसाठा कमी होत चालला आहे. सध्या जून अखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा जलाशयामध्ये आहे. पण पाऊस लांबल्यास पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्मयता आहे. सध्या राकसकोप जलाशयाची पाणीपातळी 2464.15 असून मागील वषी 2461.19 फूट होती. मागील वर्षीच्या तुलनेत तीन फुटाने पाणीसाठा जादा आहे. यामुळे भविष्यात पाणी टंचाईची समस्या भासणार नाही अशी अपेक्षा आहे. पण अयोग्य नियोजनामुळे पाणी समस्या निर्माण होत आहे.
सध्या पाच दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र पावसाला वेळेत प्रारंभ झाला नाही तर पाणी टंचाईची समस्या भेडसावण्याची शक्मयता आहे. त्यामुळे पाणी टंचाई&च्या काळात पाणी पुरवठय़ाचे नियोजन करण्यासाठी आवश्यक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत, यामुळे पाण्याचा वापर जपून करावा लागणार आहे.