शाहु महाराज राज्यभिषेक दिन उत्साहात साजरा
प्रतिनिधी/ सातारा
ंथंड हवेच्या गारठय़ात भल्या पहाटेच्या वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोषात, तुताऱयांच्या निनादात, सनईचा मंजूळ स्वर, हलगीच्या वादनाने किल्ले अजिंक्यताऱयावरील राजसदरेवर वातावरण शिवभय झाले होते. निमित्त होते छत्रपती शाहु महाराजांच्या राज्यभिषेक दिन सोहळय़ाचे. शिवभक्त, शाहुभक्तांनी किल्याच्या प्रवेशद्वारापासून छत्रपती शाहु महाराजांची दहा वर्षापूर्वी ठरवल्याप्रमाणे पालखी जयघोषात फुलांच्या वर्षावात गडावरील देवतांचे दर्शन घेवून राजसदरेवर जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात आसमंत दणाणून सोडत विसावली. 2032 साली चांदीच्या पालखीत सोन्याची छ. शाहु महाराजांच्या मूर्तीसह पालखी सोहळा करण्याचा संकल्ल्प या दिनी करण्यात आला.
गेली 12 वर्षांपासून शिवराज्यभिषेक उत्सव समितीच्यावतीने छत्रपती शाहु महाराजांचा राज्यभिषेक सोहळा किल्ले अजिंक्यताऱयावर साजरा करण्यात येतो आहे. याही वर्षी प्रथेप्रमाणे उत्साही वातावरणात शाहु महाराजांचा राज्यभिषेक दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सह्याद्री प्रतिष्ठानचे श्रमिक गोजममुंडे, कन्हैय्यालाल राजपुरोहित, संतोष शेडगे, दत्ताजी भोसले, नगरसेवक शेखर मोरे-पाटील, संग्राम बर्गे, शिवराज्यभिषेक उत्सव समितीचे दीपक प्रभावळकर, सुदामदादा गायकवाड, निलेश झोरे, सचिन जगताप, ऍड. विनीत पाटील, युवा करिअर ऍकॅडमीचे विश्वास मोरे, एलबीएस कॉलेजचे महेश गायकवाड, ऍड. अरविंद कदम, मंगेश काशिद, रवी पवार, प्रकाश घुले, गणेश दुबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कुडकुडत्या थंडीत छत्रपती शिवाजी महाराज कि जयचा जयघोष करत शिवभक्त व शाहु भक्तांनी भल्या पहाटे गड गाठला. गडाच्या पायथ्याला सगळय़ा शिवभक्तांनी छत्रपती शाहु महाराजांच्या पालखीला प्रारंभ केला. पालखी भराभर मावळय़ांनी गडाच्या पायऱया चढवत नेली. गडावरील देवतांचे दर्शन घेवून राजसदरेवर छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शाहु महाराज की जय अशा घोषणा देत विसावली. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शाहु महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करुन राज्यभिषेक दिन साजरा करण्यात आला.
2032च्या संकल्पास खासदार उदयनराजेंकडून 1 किलो चांदी अर्पण
शिवराज्यभिषेक उत्सव समितीने किल्ले अजिंक्यताऱयावर 2032 साली छत्रपती शाहु महाराजांचा स्वराज्यभिषेक दिन साजरा करण्याचा संकल्प केला. हा विचार ऐकताच शिवरायांचे थेट तेरावे वंशज खासदार उदयनराजेंनी हा संकल्प ऐकताच त्यांनी लगेच समितीला 1 किलो चांदी अर्पण केली. या संकल्पात शिवराज्यभिषेक उत्सव समितीच्यावतीने पाठीशी आम्ही खंबीर उभे असल्याचे त्यांच्यावतीने सांगण्यात आले. राजसदरेवर ही घोषणा झाली त्यावेळी जयघोषात आणि टाळय़ांच्या कडकाडाटात त्याचे स्वागत झाले.
पालखीला महिला भगिनीनी दिला खांदा
किल्यावर पालखी पोहचताच मंगळाईच्या दर्शनानंतर आज राजमाता जिजाऊ जयंती असल्याने उपस्थित महिला भगिनींनी छत्रपती शाहु महाराजांच्या पालखीला खांदा दिला. पालखीवर पुष्पवृष्टी करत शिवाजी महाराज की जयघोष म्हणत पुढे तुताऱयांच्या निनाद, हलगीचा आवाजात वातावरण बदलून गेले होते.
मुस्लिम बांधवांनाही पालखीचा सन्मान
इतिहासामध्ये पालखीला एक मोठे महत्व आहे. पालखीचा सोहळा शाहु महाराजांच्या राज्यभिषेक सोहळय़ानिमित्ताने काढण्यात आला होता. या सोहळय़ात पालखीचा मान मुस्लिम बांधवांना देण्यात आला. अगदी मंदिरापर्यंत त्यांना हा सन्मान देण्यात आला होता.
मोरे-पाटील अन् जगताप घराण्याने जपली परंपरा
गोडोली गावचे मानकरी म्हणून मोरे-पाटील यांची ओळख आहे. गोडोलीच्या देवाचे मानकरी शेखर मोरे-पाटील हे दरवर्षी न चुकता या सोहळय़ाला हजेरी लावतात तसेच गोडोलीतील जगताप घराणेही या सोहळय़ाला हजेरी लावतात. मोरे-पाटील आणि जगताप घराण्याने याहीवर्षी आपली परंपरा जपली आहे.
निमंत्रणाशिवाय कार्यक्रम साजरा
कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱयांनी नवे निर्बंध लागू केले असल्याने यावर्षी आयोजकांच्यावतीने कोणालाही निमंत्रण दिले नव्हते वा कोणतीही निंमंत्रणपत्रिका छापली नव्हती. केवळ दरवर्षीप्रमाणे गडावर कार्यक्रम आहे एवढेच माहिती असल्याने शिवभक्तांनी हजेरी लावली. कोरोनाचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम अतिशय छान पद्धतीने साजरा करण्यात आला.
झोरे यांनी उलघडे छत्रपती शाहु महाराजांच्या जीवनाचे विविध पैलू
किल्ले अजिंक्यताऱयावर मराठा साम्राज्यातील छत्रपती शहाजींराजेंपासून सर्वाचे पदस्पर्श झालेले आहेत. रायगडानंतर मराठयांचे सुवर्णसिंहासन उभे राहिले ते किल्ले अजिंक्यताऱयावर. छत्रपती शाहु महाराज हे अजातशत्रू असे व्यक्तीमत्व होते. शाहु महाराजांच्या कागदपत्रांची पडताळणी केली तर त्यांनी अनेक मोहिमा केल्याचे आढळून येते. रायगड पुन्हा जिंकण्याची मोहिम त्यांनी केली होती. सिद्याची झोप उडवली होती त्यांनी. पोर्तुगिज, डच यांना शाहु महाराजांची भिती होती. कलकत्यात मराठा स्ट्रेंच आजही शाहुंच्या भितींने त्याकाळी उभा केल्याचे सांगण्यात येते. शाहु महाराजांचे पर्व उभे राहते आहे. शाहु महाराजांचा इतिहास उजेडात आणला गेला पाहिजे, असे मत आपल्या व्याख्यानातून शाहु व्याख्याते निलेश झोरे यांनी मांडले.
सरकारच्यावतीने हा दिन साजरा करावा
हिंदूस्थानाचा इतिहास मोठा आहे. त्यामध्येच थोरल्या शाहु महाराजांचा इतिहास दुर्लक्षित राहिलेला आहे. दिल्लीच्या तख्तापर्यंत ज्यांनी राज्य केले ते शाहु महाराज. त्यांचा राज्यभिषेक सोहळा साताऱयात होत आहे. खरेतर हा सोहळा राज्यात, देशात व्हायला पाहेजे. येत्या काळात मोठया प्रमाणात हा सोहळा होईल. आता शाहु पर्वाची सुरुवात झालेली आहे. 12 वर्षांपूर्वीपासून सुरु केला हा सोहळा बहरत आहे. 2032 साली चांदीच्या पालखीचा संकल्प केलेला आहे. दीपक सरांनी दुर्ग संमेलने सुरु केली. त्या संमेलनाच्या माध्यमातून अनेक शिवप्रेमी तयार झाले, असे सह्याद्री प्रतिष्ठानचे श्रमिक गोजममुंडे यांनी सांगत पुढे ते म्हणाले, किल्ले अजिंक्यताऱयाची स्थिती चांगली नाही. मराठय़ाची राजधानी चांगली करण्यासाठी शिवभक्तांनी एकत्र येवूयात, असा विचार त्यांनी व्यक्त केला.
2032 चा संकल्प तडीस नेण्याची प्रतिज्ञा
मराठय़ांची राजधानी किल्ले अजिंक्यताऱयावरुन अटकेपार झेंडे लावले. त्याच राजधानीचे हिंदूनृपती छत्रपती शाहु महाराज यांचा राज्यभिषेक दिन सोहळा हा 2032 साली चांदीच्या पालखीतून आणि सोन्याच्या मूर्तीने करण्याची प्रतिज्ञाच राजसदरेवरुन आपण करतो आहोत. शिवराज्यभिषेक उत्सव समितीने निर्धार केला असून तो पूर्ण करु असे शिवराज्यभिषेक उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष दीपक प्रभावळकर यांनी सांगितले.
मंत्रमुग्ध करणारे सुत्रसंचालन
गोडोली गावचे सुनील मोरे-पाटील यांनी भारदारपणे या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करुन कार्यक्रमावी उंची वाढवली. दरम्यान, आभार संग्राम बर्गे यांनी मानले. तर यावेळी फेटे बांधणारे मंगेश काशिद, सनई वादक जाधव, वाढेचा हलगी ग्रुप यांचा सन्मान करण्यात आला. तसेच उत्स्फुर्तपणे ऍड. अरविंद कदम, मंदार शेटे, ऍड. विनीत पाटील यांनी आपली मते मांडली.
शाहु महाराज पालखी सोहळा समितीच्यावतीने पोस्टरचे अनावरण
शाहु महाराज यांच्या जयंती दिनानिमित्ताने काढण्यात येणाऱया गंगावली ते राजधानी सातारा या पालखी सोहळय़ाच्या भिती पत्रकाचे अनावरण राजसदरेवरुन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी छत्रपती शाहु महाराज पालखी सोहळा समितीचे सर्व मावळे उपस्थित होते.
युवा करिअर ऍकॅडमीच्या विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य
शाहु महाराजांच्या राज्यभिषेक दिन सोहळय़ांच्या कार्यक्रमांची उंची मान्यवरांच्या भाषणाने वाढत गेली. त्यामुळे उपस्थित असलेल्या युवा करिअर ऍकॅडमीच्या विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले. सर्वच विद्यार्थ्यांनी जय भवानी जय शिवाजी अशा जयघोषात राजसदरेवरच निश्चय केला.