ऑनलाईन टीम / जयपूर :
राजस्थान सरकारने दिवाळीच्या आधी फटाके विक्रीवर बंदी घातली आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
याबाबत माहिती देताना मुख्यमंत्री गेहलोत म्हणाले की, कोरोना व्हायरसचा प्रसार थांबविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. फिटनेस सर्टिफिकेटशिवाय चालणार्या वाहनांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल. राजस्थानच्या गृहखात्याने 31 डिसेंबरपर्यंत फटाक्यांवर बंदी घातली आहे.
पुढे ते म्हणाले की, फटाक्यांमधून निघणार्या धुरामुळे कोविड रुग्ण आणि इतरांनाही हृदय व श्वसनाचा त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत लोकांनी दिवाळीच्या वेळी फटाके टाळले पाहिजेत. फटाक्यांच्या विक्रीसाठी तात्पुरता परवाना बंद करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यासोबतच विवाहसोहळा आणि इतर समारंभातही फटाके वाजवणे थांबवावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.