- सरकारकडून आदेश जारी
ऑनलाईन टीम / जयपूर :
राजस्थानमध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राजस्थान सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, 31 डिसेंबरपर्यंत राजस्थानमधील कोटा, जयपूर, जोधपूर, बिकानेर, उदयपूर, अजमेर, भिलवाडा, नागौर, पाली, टोंक सीकर आणि गंगानगर आदी शहरांच्या सीमा अंतर्गत रात्री 8 ते सकाळी 6 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्याचे आदेश दिले आहेत.
राजस्थान सरकारच्या निर्णयानुसार 31 डिसेंबर 2020 पर्यंत नियंत्रण क्षेत्रात लॉकडाऊन असेल. या काळात केवळ अत्यावश्यक सेवाच उपलब्ध असतील. यासोबतच सरकार कडून तयार करण्यात आलेली विशेष पथके प्रत्येक घराघरात देखरेख करतील.
सरकारने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, सर्व शाळा , कॉलेज आणि कोचिंग संस्था 31 डिसेंबर पर्यंत बंदच राहतील. यासोबतच सिनेमा हॉल, मल्टिप्लेक्स यासारखी गर्दीची ठिकाणे देखील बंदच राहतील. मंदिरे, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना 31 डिसेंबरपर्यंत परवानगी नाकारण्यात आली आहे.