ऑनलाईन टीम / जयपूर :
राजस्थानमध्ये शुक्रवारी कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. असे असले तरी राजस्थानमधील अशोक गहलोत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार, राजस्थानमध्ये पुन्हा एकदा नाईट कर्फ्यू वाढवण्यात आला आहे. नाईट कर्फ्यूमध्ये लागू असलेले सर्व नियम पुढील आदेश येईपर्यंत जारी असणार आहेत. याआधी पासूनच राजस्थानमध्ये रात्री 8 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जारी असलेला नाईट कर्फ्यू 15 जानेवारी पर्यंत वाढवण्यात आला आहे.
- सायंकाळी 7 नंतर सर्व दुकाने बंद
नाईट कर्फ्यूसाठी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, अत्यावश्यक सेवा सोडून अन्य सर्व दुकाने सायंकाळी 7 वाजेपर्यंतच सुरू ठेवली जातील. त्यानंतर रात्री 8 ते सकाळी 6 पर्यंत नाईट कर्फ्यू जारी असेल. यासोबतच या दरम्यान, मास्क न लावल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तसेच लग्न समारंभ, सामाजिक, धार्मिक आणि राजकीय सभांमध्ये 100 पेक्षा अधिक लोकांना परवानगी नाकारण्यात येणार आहे.