ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या राजोरी जिल्ह्यातील थानामंडी भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. सुरक्षा दलांनी चार ते पाच दहशतवाद्यांच्या एक गटाला घेरले आहे. गुप्तचर संस्था गेल्या दोन आठवड्यांपासून इलेक्ट्रॉनिक टेहाळणीद्वारे दहशतवादी गटावर लक्ष ठेवून होत्या. दहशतवादी गट राजोरीला पोहचल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने या भागाला वेढा दिला असून, चकमक सुरू आहे.
जम्मू खोऱ्यात नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या दहशतवादी संघटना आता दहशतवादी कारवाया तीव्र करण्यात गुंतल्या आहेत. दरम्यान, पोलीस, लष्कर आणि गुप्तचर यंत्रणांच्या अचूक माहितीमुळे दहशतवाद्यांचे हे प्रयत्न हाणून पाडले जात आहेत.