जमीन मालकी हक्क, म्हादई नदी रक्षणासबंधी सरकारकडून जनतेचा आवाज दडपण्याचा प्रयत्न
वाळपई / प्रतिनिधी
रानटी जनावरांचा उपद्रव म्हादई अभयारण्याचे प्रकल्प व जमीन मालकीचा प्रश्न या अशा अनेक प्रश्नासंदर्भात सत्तरी तालुक्मयातील ग्रामीण भागातील जनतेला मोठय़ा प्रमाणात अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तसेच तालुक्मयातील ग्रामीण भागातील जनता अनेक प्रकारच्या संघर्षांना तोंड देत निर्माण करु पाहणाऱया संघर्षाला आडकाठी निर्माण करून या जनतेचे जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून होत आहे. सत्तरी तालुक्मयातील गोळवली धनगरवाडा येथील धनगर बांधवांना वाघांच्या मृत्यूसंदर्भात संशयास्पद अटक करण्यात आली असलीतरी वाघांच्या वाघांच्या मृत्यूला पूर्णपणे गोवा सरकारची वनखात्याची यंत्रणा पूर्णपणे जबाबदार असल्याचा आरोप करंझोळ येथील देवस्थानच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत भूमिपुत्र संघटनेच्या नेत्यांनी केला आहे.
यामुळे जमीन मालकीचा प्रश्न अभयारण्याच्या जाचक अटी विरोधात व धनगर बांधवांच्या समर्थनार्थ निषेध धरणे कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार दिनांक 17 रोजी वाळपई येथील वनखात्याच्या कार्यालयासमोर आयोजित करण्यात आलेला आहे. यामुळे सत्तरी तालुक्मयातील सर्व नागरिकांना चलो वाळपईचा नारा देण्यात आला असून यामुळे पुन्हा एकदा वेगवेगळय़ा प्रश्नासंदर्भात शक्तीप्रदर्शन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. यामुळे सत्तरी तालुक्मयातील भूमिपुत्रांनी जमिनीचा मालकी हक्क रानटी जनावरांचा उपद्रव व म्हादई अभयारण्याच्या विरोधात या लढय़ामध्ये मोठय़ा प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन भूमिपुत्र संघटनेच्या माध्यमातून करण्यात आले आहे .
याबाबतची माहिती अशी की गेल्या अनेक वर्षापासून सत्तरी तालुक्मयातील जनता जमिनीचा मालकी हक्क प्राप्त करण्यासाठी वेगवेगळय़ा स्तरावर संघर्ष करीत आहेत .त्याचप्रमाणे 1999 साली म्हादई अभयारण्याची अधिसूचना जाहीर करण्यात आल्यानंतर त्याच्या जाचक अटीना तेथील भूमिपुत्रांना सामोरे जावे लागत आहे .एका बाजूने रानटी जनावरांचा उपद्रव व त्यातच वाघाच्या मृत्यूनंतर धनगर समाजासमोर निर्माण झालेली अस्थिरतेची टांगती तलवार त्याच्या पार्श्वभूमीवर आता भूमिपुत्रांनी तीव्रपणे लढा देणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत भूमिपुत्र संघटनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत करण्यात आले आहे.
याप्रसंगी व्यासपीठावर सत्तरी भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष हरिचंद्र गावस, संघटनेचे पदाधिकारी आंतानियो पिंटू विश्वेश परब, पांडुरंग नामदेव गावडे नकुल गावडे चंद्रकांत गावकर महादेव गावकर, रोहिणी तुकाराम नाईक व सत्तरी तालुक्मयातील वेगवेगळय़ा गावातील प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते.
वाघांच्या मृत्यूस वनखात्याची यंत्रणा जबाबदार
याप्रसंगी बोलताना संघटनेचे अध्यक्ष हरिश्चंद्र गावस म्हणाले की, गोळवली सत्तरी येथे चार वाघांचा मृत्यू झाल्याचे समजण्यात आलेले आहे. मात्र या वाघाच्या मृत्युसंदर्भात धनगर बांधवातील गरिबांना दोषी धरून त्यांना अटक करण्यात आलेली आहे. एरवी या पुर्ण प्रकरणात वनखात्याची यंत्रणा जबाबदार असून त्यांच्या निष्काळजीपणाचा कळस झाल्यामुळेच वाघांचा मृत्यू झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला .आतापर्यंत निसर्गाच्या सानिध्यात जाणाऱया या बांधवांनी निसर्गाचे संवर्धन व रक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे योगदान दिले आहे .यामुळे त्यांना संशयित म्हणून पकडून त्यांच्यावर मानवी अत्याचार करण्याचा प्रयत्न निषेधार्थ आहे. यामुळे भूमिपुत्र संघटना या बांधवांच्या मागे खंबीरपणे उभे राहणार असून 17 रोजी आयोजित करण्यात आलेल्या निषेध सभेत याबांधवांना पूर्णपणे सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले..
रानटी जनावरे नाही सरकारच उपद्रवी
गेल्या अनेक वर्षापासून सत्तरी तालुक्मयामध्ये रानटी जनावरांचा उपद्रव वाढलेला आहे. यामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झालेली आहेत. त्या दूर करण्याचे ऐवजी सरकार मात्र पूर्णपणे निष्काळजीपणाने वागत आहे. यामुळे राज्यातील जनावरे नाहीतर सरकार उपद्रवी ठरत असल्याचा आरोप यावेळी हरिचंद्र यांनी केला. आमच्या ज्ये÷ांच्या म्हणण्यानुसार कोसाक वाघ व येतीक नाग अशा प्रकारचे म्हण होती यामुळे आपल्याला प्रचंड प्रमाणात वाघांची संख्या होती. येथील चार वाघांचा मृत्यू यासंदर्भात सरकारने जर गांभीर्याने घेतले असते तर त्यांचा मृत्यू झाला नसता यामुळे त्यांच्या मृत्यू संदर्भात एवढा गवगवा करण्यापेक्षा तालुक्मयातील गरीब जनतेच्या समस्या सोडवा..
जय जवान जय किसान त्याला सरकारकडून सहकार्य नाही
एका बाजूने शेतकरी हा या देशाचा भक्कम कणा असल्याचे सांगण्यात येत आहे. सरकार मात्र या किसानाला कोणत्याही प्रकारचे सहकार्य करीत नसून यामुळे गंभीर स्वरूपाच्या निर्माण झालेल्या समस्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना अभय देणे गरजेचे होते. मात्र अभय देण्याऐवजी त्यांच्यावर अन्याय व अत्याचार करण्याचा प्रयत्न सरकार करीत असल्याचे निवेदन शेतकरी बातु गावडे यांनी केले. आज जंगलामधील रानटी जनावरे गावांमध्ये येण्यास वनखात्याची यंत्रणा जबाबदार असून त्याचे व्यवस्थापन होत नसल्यामुळे रानटी जनावरानी आपला मोर्चा गावाकडे वळविण्याचे श्री गावडे यांनी स्पष्ट केले..
मालकीहक्क नसल्यामुळे कृषी योजनांचा लाभ नाही
सतरी तालुक्मयामध्ये जमिनीचा मालकी हक्काचा प्रश्न गांभीर्याने उभा राहिलेला आहे. त्यामुळे कृषी खात्याच्या अनेक योजना असतानाही त्यांचा लाभ याभागातील जनतेला उपलब्ध होत नाही ही खरोखरच दुर्दैव आहे. गोवा मुक्तीनंतर ते आतापर्यंत यासाठी कोणत्या प्रकारचा प्रयत्न झालेला नाही. याला या भागातील राजकारणीच खासकरून जबाबदार असल्याचा आरोप यावेळी सामाजिक कार्यकर्ते विश्वेश परब यांनी केला.
भुमिपुत्रावर गुन्हा म्हणजे आवाज दडपण्याचा प्रयत्न
या भागातील जमिनीचा प्रश्न हातात घेऊन संघर्ष करणाऱया भूमिपुत्र संघटनेच्या कार्यकर्त्यांवर सरकारने दबाव टाकून गुन्हे दाखल केलेले आहेत. ही खरोखरच निषेधार्थ असून चार जणांवर गुन्हे दाखल करून सरकारने आपणच खोटे असल्याचे सिद्ध केले आहे हिंमत असेल तर सर्व भूमिपुत्रावर गुन्हे दाखल करा अशा प्रकारचे आवाहन रोहिणी तुकाराम नाईक यांनी केले आहे. कितीही गुन्हे दाखल केले असले तरी भूमिपुत्रांच्या अस्तित्वाचा लढा कदापि बंद होणार नाही.
कायद्याबाहेर जाऊन भूमिपुत्रावर अन्याय
गोव्यामध्ये पोर्तुगिजांची राजवट होती मात्र अजून पर्यंत त्यांचे कायदे अमलात येत असल्याचे आपणास पहावयास मिळत आहे. याच माध्यमातून भूमिपुत्रावर वेगवेगळय़ा माध्यमातून अन्याय करण्याचा प्रयत्न सातत्याने सरकार करीत आहे. गोळावली सत्तरी येथील वाघांचा मृत्यू संदर्भात बोलताना पिंटू यांनी सांगितले की ज्यांची गाय मारली आहे त्यांनी गप्प रहावे का ?वनखात्याने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे केली असती तर या वाघांचा मृत्यू झाला नसता. धनगर बांधव हा संपूर्णपणे निसर्गाची रक्षण करणारा घटक आहे. त्यामुळे त्यांना सदर भागांमध्ये जगण्याचा अधिकार असून सहकारनेच आपल्या जनावरांना जंगलामध्ये सुरक्षित ठेवण्यासाठी उपाययोजना करावी अशा प्रकारचे निवेदन केले.
यावेळी सहदेव गावडे सौ शशी झर्मेकर यांनी याप्रसंगी आपले विचार मांडले. शेवटी सहदेव गावडे यांनी सर्वांचे आभार मानले.
17 रोजी वाळपईत धरणे आंदोलन.
28 मे रोजी भूमिपुत्र संघटनेच्या माध्यमातून वाळपईत आयोजित करण्यात आलेल्या मोर्च्या व त्यानंतर कुमठोळ येथील अभयारण्याच्या कार्यालयाला अज्ञात इसमाने आग लागल्यानंतर भूमिपुत्र संघटनेच्या चार जणावर सरकारने गुन्हे दाखल केले आहेत. त्यात हरिचंद्र गावस, आतानिया पिंटू रणजीत राणे व अर्जुन गावडे यांचा समावेश आहे. त्याच्याविरोधात वाघाच्या मृत्यु संदर्भात धनगर बांधवांना संशयित म्हणून अटक करण्यात आल्याच्या निषेधार्थ चलो वाळपई असा नारा भूमिपुत्र संघटनेच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. यामुळे 17 रोजी दुपारपर्यंत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. याच दिवशी दाखल करण्यात आलेल्या चार जणांना वाळपई प्रथम न्यायदंडाधिकारी कोर्टा मधून समजदारी करण्यात आलेले आहे.