बुधवार दि.10 ते मंगळ. दि. 16 नोव्हेंबर 2021
कमाई व खर्च यांचं योग्य नियोजन केले तरच निभाव लागेल
हाती पैसा टिकत नाही, संसार कसा चालवायचा, रोजच्या खर्चाचा ताळमेळ कसा लावायचा? असा प्रश्न हल्ली सर्वानाच भेडसावत आहे. महागाईने कळस गाठलेला आहे. सर्वसामान्य जनता महागाईच्या वणव्यात अक्षरशः होरपळून निघत आहे, पण जनतेला कोणीच वाली नाही. कृतिका नक्षत्रातील राहुमुळे आगामी एप्रिलपर्यंतचा काळ आर्थिक बाबतीत अतिशय खडतर व धोकादायक आहे. कुणी आपल्याला या आर्थिक अडचणीतून वर काढेल, मार्ग दाखवेल या भ्रमात कोणीही राहू नका. स्वतःचे स्वतः नियोजन करण्यास शिका. कमाई आणि खर्च यांचा ताळमेळ जर योग्य प्रकारे साधता आला तरच या जगात तुमचा निभाव लागेल. ज्या ठिकाणी प्रश्न आहे तिथे उत्तर हे निश्चित असते, पण आपण ते हुडकले पाहिजे. ज्याला कोणी नाही त्याचा त्राता परमेश्वर म्हणतात, हे जरी खरे असले तरी आपले प्रयत्नही हवेतच. कोरोना व काही चुकीचे धोरणांमुळे अनेकांच्या नोकऱया गेल्या. उद्योग व्यवसाय बंद पडले आहेत. पण त्याकडे कोणाचेही लक्ष नाही. त्यातच वाढती महागाई, हाती पैसा नाही, त्यामुळे यापुढे चोऱयामाऱया, दरोडे हे प्रकार खूपच वाढतील. त्यासाठी सर्वांनी खर्चात काटकसर कशी करता येईल, त्याचा आतापासूनच अभ्यास करावा. तुमची रास कोणतीही असो देवा धर्माकडे विशेष लक्ष द्या, लक्ष्मीच्या प्रसन्नतेसाठी तिची आराधना चालू ठेवा. तुमचा पैसा कष्टाचा असेल तर कमी पैशातही तुम्ही सुखी जीवन जगू शकता व इतर मार्गाने जर कमाई असेल तर कितीही पैसा कमावला तरी तो तुम्हाला पुरणार नाही. अशा मार्गाने कमावलेला पैसा कोणते संकट केव्हा आणिल आणि तो कोणत्या मार्गाने जाईल हे कळणार नाही. काहीवेळा प्रतिष्ठा आणि गरज यासाठी लोक महागडय़ा गाडय़ा घेतात पण हल्लीची परिस्थिती कशी आहे हे पाहून त्यानुसार वागा. जिथे सायकलने काम होतं तिथे महागडय़ा मोटरसायकली व कारगाडय़ा वापरू नका. मी सायकलने फिरल्यास लोक काय म्हणतील, असा विचार करू नका. तुम्ही सायकलने फिरलात अथवा महागडय़ा कारने अथवा विमानाने फिरलात तरी तुमच्याकडे कोणी बघत नाही. महागडय़ा हॉटेलपेक्षा साध्या हॉटेलातदेखील पोटभर जेवण मिळू शकते. हल्लीच्या काळात पैसे राखून ठेवण्याला अधिक महत्त्व द्या. सर्व नाटके करता येतात, पण पैशाचे सोंग करता येत नाही. विशेषतः तरुण वर्गाने कृपया करून गाडय़ा वापरणे बंद केले पाहिजे, मनात आणल्यास सर्व काही शक्य आहे.
मे ष
धंदा उद्योग व्यवसायासाठी प्रवास घडतील. कुटुंबाचे आरोग्य सांभाळावे. किरकोळ कारणावरून वाद होण्याची शक्मयता. अकल्पित धनलाभ, भ्रष्टाचार व लाचलुचपती पासून मिळणारा पैसा किंवा लॉटरी व शर्यत यातून नुकसान होईल.त्यासाठी अशा मार्गाला लागू नका. तुमचे क्षेत्र कोणतेही असो आर्थिक बाबतीत जरा सावध राहणे आवश्यक. मंगल बुध योग, कमाई आणि खर्चाच्या बाबतीत योग्य ताळतंत्र ठेवण्यास सुचवित आहे.
वृषभ
नोकरी व्यवसायात उत्तम योग.वरची जागा मिळणे किंवा पगारवाढ होऊ शकते .पण कितीही चांगले काम केले. तरी मालकाकडून नको ती बोलणी मात्र खावी लागतील. पण त्यात त्यांचा हेतू वेगळा असेल. इतर सहकारी अथवा नोकर-चाकर मंडळीकडून काही महत्त्वाच्या गोष्टी समजतील. पाकशास्त्रात प्राविण्य असेल. अथवा हॉटेल मॅनेजमेंट कोर्स केलेला असेल तर मोठय़ा पगाराची नोकरी मिळेल. विवाहासाठी प्रयत्न करीत असाल तर प्रामाणिक आणि विश्वासू स्थळ मिळेल.
मिथुन.
शिक्षण प्रकाशन,संपादक व साहित्य या क्षेत्राशी संबंध असेल तर फार मोठे यश मिळेल. संततीच्या बाबतीत विशेष लक्ष ठेवावे लागेल. त्यांची एखादी चूक देखील तुमच्या प्रति÷sला धोका पोहोचवू शकेल. आर्थिक बाबतीत सप्ताह उत्तम आहे. कोणत्याही प्रकारे फारशी अडचण पडणार नाही पण तरीही वाढत्या महागाईला अनुसरून योग्य ठिकाणी खर्च करा. केवळ प्रतिष्ठा अथवा मोठेपणा दाखवण्यासाठी कोणतेही अवडंबर करू नका.
कर्क
सप्ताह सर्व दृष्टीने चांगला असून आर्थिक बाबीही सुधारत जातील. पण खर्च मात्र वाढतील.अनावश्यक गोष्टींना फाटा देऊन खर्चावर नियंत्रण ठेवल्यास पुढील संकटे टळतील. कमाई कमी असून देखील राहणीमान साधे व नीट ठेवल्यास कोणत्याही तक्रारी अडचणी जाणवणार नाहीत. घर, जागा, वाहन घेताना पुढील काळाचा विचार करूनच निर्णय घ्या. कर्ज काढून सण साजरे करू नका.
सिंह
तातडीच्या कामासाठी प्रवास घडतील. उत्कृष्ट कार्य पद्धती, सूक्ष्म निरीक्षणशक्ती ,तसेच कुणाकडून कसे काम करून घ्यावे याचे उत्तम ज्ञान व आकलनशक्ती चांगली असल्याने महत्त्वाच्या कामासाठी तुमच्या नावाची शिफारस केली जाईल. आलेल्या संधीचा योग्य रीतीने फायदा करून घ्या.सप्ताहाच्या उत्तरार्धात काही बाबतीत ग्रहमान अनिष्ट आहे.राहती वास्तू आणि शेजारीपाजारी यांचे बाबतीत जरा जपून रहावे लागेल.
कन्या
कार्यकर्तृत्वाला प्रोत्साहन देणाऱया चांगल्या व्यक्ती भेटतील. त्यांच्यामुळे तुमच्या जीवनाला चांगले वळण मिळेल. पैसा कसातरी खर्च करण्याची वृत्ती असेल तर ती बदला अन्यथा यापुढे भयानक आर्थिक टंचाई जाणवेल. काय मिळवता किती कमावता यापेक्षा काय व कसे खर्च करता याकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. तुमच्या बुद्धिकौशल्याची सर्वत्र प्रशंसा होईल लोकप्रियता लागेल त्यातूनच नवीन कामे मिळतील व आर्थिक स्थितीही सुधारली जाईल.
तूळ
लहानपणापासून लागलेल्या चांगल्या सवयी आणि कर्तृत्वाची तेजस्वी बैठक याचा या आठवडय़ात चांगला फायदा होईल. मनासारखी नोकरी मिळेल उद्योग व्यवसाय असेल तर त्यात नवीन वाढ करू शकाल.लिखाणाची आवड असेल, गणित आणि व्यवहार ज्ञान उत्तम असेल तर या आठवडय़ात तुम्हाला मनासारखी नोकरी मिळू शकते अथवा एखाद्या व्यवसायात भागीदार म्हणून संधी देखील मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवा.
वृश्चिक
. लक्ष्मीकृपेच्या दृष्टीने ग्रहमान चांगले आहे.पण रवी केतू भ्रमण चांगले नाही त्यामुळे वरि÷ांशी मतभेद होऊ शकतात हाती घेतलेले काम वेळेत होईलच असे नाही त्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागेल. कोणतीही नवीन जबाबदारी अथवा नवीन काम हाती घेण्या पेक्षा सध्या असलेले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कारण सध्याचे काम तुम्ही कसे करता यावरच तुमचे पुढील भवितव्य अवलंबून आहे. चैनीवृत्ती व्यसन व निष्कारण भटकण्याची सवय असेल तर ती बदला कारण त्यातूनच पुढे काही समस्या निर्माण होणार आहेत.
धनु
चांगुलपणाचा कुठेतरी फायदा होतो याचा अनुभव या आठवडय़ात येईल एखादे न होणारे अवघड काम देखील कुणाच्यातरी मदतीने पूर्ण होईल. नोकरी-व्यवसायात अवघड जबाबदारी पडेल. काहीजणांना असलेले काम संभाळणे आणि अचानक दुसरीकडे जावे लागणे असे प्रकारही या आठवडय़ात घडू शकतात पण योग्य तारतम्य ठेवून कोणत्या कामाला प्राधान्य द्यावे हे ठरवा त्यानुसार निर्णय घ्या.
मकर.
रवीचे भ्रमण सर्व दृष्टीने अनुकूल आहे त्यामुळे नोकरी-व्यवसाय,वाटाघाटी करारमदार, पगारवाढ, प्रमोशन यादृष्टीने प्रयत्न करण्यास हरकत नाही. मनाप्रमाणे अनेक गोष्टी साध्य होतील. पण पुढील सप्ताहात ग्रहमान काही बाबतीत त्रासदायक ठरणार आहे. शक्मयतो कोणत्याही बेकायदा प्रकरणात गुंतू नका तसेच नको तिथे तडजोडही करू नका. या आठवडय़ात देण्याघेण्याच्या बाबतीत जितके सावध राहाल तितके चांगले ठरेल.
कुंभ
नावलौकीक,प्रासिद्धी,प्रवास,लिखाण,साहित्यक्षेत्र,तंत्रज्ञान,विमानप्रवास,मानसिक समाधान यादृष्टीने ग्रहमान अनुकूल आहे. विवाहाच्या वाटाघाटी, साखरपुडा नव्या ठिकाणी प्रवेश, वास्तुशांती याबाबतीतही उत्तम यश मिळेल. पण सप्ताहाच्या उत्तरार्धात नोकरी व्यवसायात काही जटील समस्या उद्भवतील त्यामुळे असलेली नोकरी सोडावी का असा प्रश्न निर्माण होईल. पण घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका.
मीन
ऐनवेळी तुमची मदत मिळाल्याने एखादी व्यक्ती मोठय़ा संकटातून वाचेल. त्याचा तुमच्या पुढील करिअरवर चांगला परिणाम होईल. गेलेली नोकरी परत मिळेल अथवा बंद पडलेल्या उद्योग-व्यवसाय पुन्हा सुरू होईल. घरातील कुटुंबियांच आरोग्य सुधारू लागेल.आर्थिक स्थितीत काही बदल झालेले जाणवतील. तुम्ही कितीही श्रीमंत असला तरी खर्चावर नियंत्रण ठेवा. ऐषारामी व चैनीवृत्तीच पुढे काही गंभीर समस्या निर्माण करील.