बुधवार दि.21 ते मंगळवार दि.27 एप्रिल 2021
पुण्याचा साठा कमी होणे हे अधोगतीचे लक्षण
दुसरा भाग
निसर्ग कुणावरही अन्याय करीत नाही. प्रत्येकाला त्याच्या बऱया-वाईट क्रर्मानुसार फळ देत असतो. काही वेळा आई-वडील-आजोबा यांच्या पुण्याईने अनेक जण वर येतात, तर काही वेळा त्यांच्या दुश्कर्मामुळे पुढची पिढी कधीही वर येत नाही, असेही दिसून येते. पुण्याईच्या साठा भराभर संपत जातो. त्याचप्रमाणे पापाचे वजनही वाढत असते. ज्योतिष शास्त्रामध्ये दशा-महादशानुसार त्याचा कालखंड समजू शकतो व त्यानुसार उपाययोजना केल्यास आपले जीवन सुखी होऊ शकते. फक्त देव देव करून किंवा मंदिराला देणग्या देऊन पुण्य वाढत नसते, तर आपल्या हातून काहीतरी चांगले कर्मही होणे आवश्यक असते. आज गावोगावी अनेकांचे पुतळे उभारलेले दिसून येतात. त्यांच्या चांगल्या कार्यापासून स्फूर्ती मिळावी हा त्यामागे हेतू असतो, पण कालांतराने हे पुतळे फक्त शोभेचे होतात. प्रचंड खर्च करून असे पुतळे उभारण्यापेक्षा तोच पैसा जर शाळा, कॉलेज, शिक्षण, हॉस्पिटल, उद्योगव्यवसाय यासाठी वापर केल्यास जगाचे खरोखरच कल्याण होईल. पण हल्ली लोकांची विचारशक्ती कमी होत चालल्याचे दिसत आहे. आज अनेक गरीब मुलांना हुशार असूनही आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षण घेता येत नाही. हाती पैसे नसल्यामुळे गंभीर आजारावर उपचार होऊ शकत नाहीत. नोकरीधंदा उद्योग नसल्यामुळे अनेकजण बेकार झाले आहेत. नोकरीसाठी वणवण भटकत आहेत. अशा लोकांसाठी आपण काहीतरी करावे असे लोकांना का वाटू नये. पूजापाठ, शांती, धर्मकार्य, जपतप हे मनःशांतीसाठी आवश्यक आहेच, पण वस्तुस्थितीकडेही दुर्लक्ष करून चालत नाही. पूर्वी कॉलरा, प्लेग, देवी, महामारी आणि हल्ली कोरोना असे जागतिक रोग पसरत आहेत. ज्याचे तो पाहून घेईल, मी त्यात का लक्ष घालावे, अशी भावना हल्ली दिसून येत आहे. आपल्यामुळे जर एखाद्याचा जीव वाचला तर त्याइतके पुण्यकर्म कुठले? बसखर्चाला पैसे नाहीत म्हणून एखाद्या गरीब व्यक्तीला खाली उतरवले जाते, त्याला कुणीही मदत करीत नाही. रस्त्यात कुत्री, मांजरी व तत्सम प्राणी जखमी होऊन पडलेले असतात पण त्यांना पाणी पाजावे, काहीतरी खाऊ घालावे असे काहीजणाना वाटत नाही. झाडे पाहिजेत, हिरवळ पाहिजे पण असलेल्या झाडांना पाणी देणे किंवा त्यांचे रक्षण करावे असे कुणाला वाटत नाही. पक्ष्यांचा चिवचिवाट हवा पण त्याना दाणापाणी द्यावे, त्यांना कोंडून ठेवू नये, त्यांचे हाल करू नयेत, देवाच्या नावाने त्यांचे बळी देऊ नयेत असे कुणालाही वाटत नाही. मग तुमच्या पुण्याच्या साठा कसा वाढणार? सतत देवधर्म करून जपजाप्य करून अनु÷ानांच्यामागे लागूनही बरेच जण दुःखातच आहेत. यामागील कारणे पहा. यांच्या हातून पूर्वजन्मात कोणते दोष घडले असतील त्याचा विचार करा, बरोबर उत्तर सापडेल.
मेष
तुमच्या राशीत असलेले चार ग्रह तुम्हाला मोठे यश देणारे आहेत. सर्व बाबतीत अनुकूल आहेत. कोणतेही महत्त्वाचे काम या महिन्याभरात करून घ्या. कोणत्याही अडचणी येणार नाहीत. आरोग्य सुधारेल. हाती पैसा खेळू लागेल. तुमच्या हातात असलेले महत्त्वाचे करारमदार यशस्वी होतील. हे चार ग्रह तुमच्या कोणत्याही इच्छा पूर्ण करण्यास समर्थ आहेत, पण चंचलपणा आणि कामाचा उरक या दोन बाबी भिन्न आहेत. त्यामुळे लहरीपणा सुटल्याशिवाय काम पूर्ण होणार नाही हौस व मौजेखातर सहली आणि प्रवासाचे योग. कोणतेही नवीन काम सुरु करण्यास अनुकूल काळ आहे.
वृषभ
राशीच्या बाराव्या स्थानी चार ग्रह एकत्र आहेत,पण काही वेळा वाईटातूनही चांगले होते, तसा प्रकार या महिन्यात पहावयास मिळेल. ग्रहमान अनिष्ट आहे असे वाटत असतानाच काही न होणारी महत्त्वाची कामेही पटकन होऊन जातील. देवाधर्मावर जर विश्वास असेल तर ‘न भूतो न भविष्यती’ असे मोठे यश मिळू शकते. लग्न कार्यातील अडचणी दूर होतील. बेकारांना नोकरी मिळेल. काही कारणाने निर्माण झालेले नात्यातील गैरसमज आपोआप दूर होतील.
मिथुन
लाभस्थानी चार ग्रह हा एक प्रकारचा सुवर्णमयी कांचनयोग म्हणता येईल. अशा योगावर महत्त्वाच्या कार्याची सुरुवात प्रचंड यश देते. मोठे धनलाभ, मित्र-मैत्रिणींची उत्तम प्रकारे मदत होईल. तसेच शिक्षणात चांगले यश मिळू शकत.s विवाहासाठी प्रयत्न करीत असाल तर त्यात यशस्वी व्हाल. या महिन्याभरात जर नोकरीची संधी मिळाल्यास शक्मयतो सोडू नका. कारण त्यातच तुमचे भाग्य दडलेले आहे. शारीरिक आजार कमी होतील. योग्य पथ्यपाणी ठेवल्यास कोणतेही गंभीर दोष जाणवणार नाहीत.
कर्क
महत्त्वाच्या दशम स्थानी चार ग्रह एकत्र आहेत. नोकरी-व्यवसाय उद्योगाच्या दृष्टीने हा चांगला योग आहे. जर नवीन काही सुरू करणार असाल तर या महिन्याभरातच करा. त्याचा पुढे फायदा होईल. पण आयोजन आणि नियोजन व त्याला कर्तबगारीची जोड यांचीही आवश्यकता आहे. पैसा राखून ठेवण्यास शिका. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करीत असाल तर अनुकूल काळ आहे. काही भाग्यवंतांना परदेशी जाण्याची संधी मिळेल.
सिंह
भाग्यस्थानामध्ये चार ग्रह आहेत. कर्तबगारीला दैवीकृपेची साथ मिळेल. त्यामुळे एकाच वेळी अनेक कामे हाती घेऊन ती पूर्ण करू शकाल. मंगलकार्याच्या वाटाघाटीत तुमचा मोठा सहभाग असेल. व्यवसायदृष्टीने तुमचा सल्ला योग्य मानला जाईल. झटपट व कमी श्रमात पैसे मिळवण्याच्या मार्गाकडे वळू नका. त्यात प्रचंड नुकसान होईल. काही जण गोड बोलून तुम्हाला तर नको त्या योजनेत पैसे गुंतवण्याचा आग्रह करतील. पण ती धोक्मयाची घंटा समजून त्यापासून दूर राहा.
कन्या
अष्टमस्थानामध्ये चार ग्रह एकत्र येणे हे आर्थिक बाबतीत चांगले असले तरी आरोग्यात बिघाड, उष्णता विकार, किरकोळ अपघात, गैरसमज, शत्रुत्वात वाढ असे काही दोषही निर्माण होतात. त्यामुळे सर्व बाबतीत सावधगिरी बाळगा. स्वतःचे वाहन, मोबाईल अथवा महत्त्वाची कागदपत्रे कुणालाही चुकूनही देऊ नका. तुमच्या नकळत त्याचा गैरफायदा घेतला जाईल, अथवा कोणाला तरी तुमच्या मोबाईलद्वारे इतरांना चुकीचा मेसेज पाठविला जाईल. त्यासाठी सावध राहा.
थूळ
सप्तमस्थानी चार ग्रहांची युती भागिदारी व्यवसायात महत्त्वाच्या घडामोडी दर्शविते. वैवाहिक जीवनात गडबड, गोंधळ, गैरसमज होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे सासरच्या कुटुंबात जर महत्त्वाच्या वाटाघाटी सुरू असतील तर त्यात चुकूनही भाग घेऊ नका. काही तातडीच्या कामानिमित्त महत्त्वाचे प्रवास घडतील. खरेदी-विक्री चर्चा, देणी-घेणी याबाबतीत ग्रहमान उत्तम आहे. राशीस्वामी शुक्र-रविच्या सानिध्यात असल्याने घाईगडबडीत एखादा निर्णय चुकण्याची शक्मयता आहे. गुरुची कृपा असल्याने मंगलकार्याच्या प्रयत्नात यश मिळेल.
वृश्चिक
ष÷स्थानी चार ग्रहांची युती नोकरी-व्यवसाय, कलाकौशल्य, आर्थिक भरभराट, व्यवसायिक तेजी या दृष्टीने अनुकूल फळे देईल. पण त्याचबरोबर उष्णताविकार पित्त व धाप लागणे, अतिविचाराने मानसिक त्रास असे प्रकारही घडवेल. त्यामुळे क्षमतेबाहेर कोणतेही काम करू नका, अथवा मोठेपणा अथवा प्रति÷sच्या नावाखाली कोणाचीही जबाबदारी घेऊ नका. दुसऱयांच्या चुका सावरताना स्वतः अडकणार नाही याची काळजी घ्या. कॉलेज विद्यार्थ्यांनी व्यसन, प्रेमप्रकरणे व वाहन वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक.
धनु
पंचमस्थानात चार ग्रहांची युती ही अनेक बाबतीत मोठे यश देणारी आहे. शिक्षणातील अडचणी कमी होतील. कुणाच्या तरी चुकिने निर्माण झालेला दैवीकोप आपोआप नाहीसा होईल. आर्थिक स्थितीत सुधारणा, संतती लाभ, मानसिक समाधान, पती-पत्नीतील प्रेम, जागेचे व्यवहार, दिवस इत्यादी बाबतीत अनुकूल काळ आहे. पण तापटपणा, अतिरेक, प्रेमप्रकरणचा मोह या बाबी अडकला असाल तर धोक्मयात येऊ शकाल. काळजी घ्या.
मकर
चतुर्थस्थानी चार महत्त्वाचे ग्रह एकत्र आहेत. वास्तुसंदर्भातील कोणतीही कामे करून घ्या. भाऊबंदकी, वाटण्यांबाबत असलेले वाद, शिक्षणातील अखेरच वर्ष घरमालक आणि भाडेकरू वाद याबाबतीत सामंजस्याने गेल्यास बरेच प्रश्न सुटतील. जागा, शेती, घरदार, प्लॉट विकण्याच्या प्रयत्नात असाल तर त्यात यश मिळेल. वास्तुशास्त्राच्या नावाखाली काहीजण पाडापाडी करण्याचा सल्ला देतील, पण त्याकडे दुर्लक्ष करा. घरातील बेशिस्त आणि अस्ताव्यस्तपणा याला आवर घातल्यास घराण्यातील अनेक दोष कमी होतील. एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळेल.
कुंभ
तृतीय स्थानामध्ये चार ग्रह एकत्र असल्याने कामाचा उत्साह वाढेल. नवीन काहीतरी करून दाखवण्याची प्रबळ इच्छा निर्माण होईल. नोकरी-व्यवसाय, उद्योग आणि विवाहकार्यासाठी तुमच्या सल्ल्याला महत्त्व प्राप्त होईल. एकाच वेळी अनेक कामे करण्याची तुमची क्षमता पाहून लोक तुमचे कौतुक करतील, पण त्या प्रमाणात पैसा मिळेलच असे नाही. गुरुचे पाठबळ चांगले असल्याने कोणतेही मंगलकार्य करण्यास अनुकूलता आहे.
मीन
धनस्थानी चार ग्रह असल्याने खर्च आणि कमाई यांचा ताळमेळ राहणार नाही. त्यामुळे अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. डोळय़ांची काळजी घ्या. सांसर्गिक विकार असलेल्यांपासून दूर राहा. जत्रा-यात्रा यांच्या माध्यमातून नको ते आजार लागू होतील. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक. नोकरी-व्यवसायात जर तुमचे कुणाशी मतभेद असतील तर ते दूर होतील. वरि÷ांशी कृपा राहील. कौटुंबिक जीवनात आनंदी व समृद्ध वातावरण राहील. राशीस्वामी गुरु अनुकूल असल्याने काही महत्त्वाचे निर्णय चुकू शकतात.