ऑनलाइन टीम / मुंबई :
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वत:ला होम क्वारनटाईन केले आहे. कोरोनाची लागण झालेल्या एका पोलिस अधिकाऱ्याच्या संपर्कात आल्याने जितेंद्र आव्हाड यांनी खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्रा येथे एका कर्मचा-याला कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना खबरदारी म्हणून क्वारनटाईन होण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे.
या कोरोनाबाधित पोलिस अधिकाऱ्याच्या संपर्कात जितेंद्र आव्हाड देखील होते. यामुळे त्यांनी स्वत:ला होम क्वारनटाईन केले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती गंभीर होत चालली असून कोरोनाबाधितांची संख्या 2000 च्या आसपास पोहोचली असून आतापर्यंत 100 पेक्षा अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे.