प्रतिनिधी / बेळगाव :
विनाशुल्क आणि तातडीने न्याय मिळावा यासाठी राष्ट्रीय लोकअदालत भरविण्यात येते. यावषी 5 वेळा राष्ट्रीय लोकअदालत भरविण्यात येणार आहे. शनिवार दि. 8 फेब्रुवारी रोजी पहिली लोकअदालत भरविण्यात येणार आहे. या लोकअदालतीचा प्रलंबित असलेल्या खटलेधारकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कायदा सेवा प्राधिकारचे सचिव विजय देवराज आरस यांनी केले आहे.
या लोकअदालतीमध्ये चेकबाऊन्स, पैशाची वसुली, कामगार खटले, विद्युत, पाणी बिल, नुकसानभरपाई याचबरोबर कौटुंबिक वादातील आणि फौजदारी खटलेही निकालात काढले जातात. वादी-प्रतिवादींना समोरासमोर बसवून न्यायाधीशांच्या समोर हा खटला निकालात काढला जातो. कोणावरही जबरदस्ती किंवा दडपण न घालता हे खटले निकालात काढले जातात. महत्त्वाचे म्हणजे विनाशुल्क हे खटले तातडीने निकालात काढले जातात.
सध्या लोकअदालतकडे 7 हजार अर्ज आले आहेत. बेळगाव न्यायालयाबरोबरच जिह्यातील प्रत्येक तालुक्मयामध्ये असलेल्या न्यायालयांमध्ये ही लोकअदालत भरविली जाते. न्यायाधीशांसमोर या खटल्याचा निकाल लागल्यानंतर त्या विरोधात वरि÷ न्यायालयाकडे अपिलसुद्धा करता येत नाही. केवळ एकच पर्याय उरतो तो म्हणजे हवे तर सर्वोच्च न्यायालयात धाव घेणे. तेव्हा दोघांनाही या न्यायालयाचा फायदा आहे. तेव्हा जनतेने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सचिव विजय देवराज आरस यांनी केले आहे.