प्राणीजन्य साथ प्रतिबंधासाठी बैठकीत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे निर्देश
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात प्राणीजन्य साथ वाढत आहे. रेबीज मृत्यूदर वाढत आहे. हा मृत्यू दर नियंत्रित करण्यासाठी कृती आराखडा तयार करा, अशी सुचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केली. यावेळी मानवी आरोग्य आणि वातावरणातील बदल यादृष्टीने कृती आराखडÎावर चर्चा झाली.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी मानवी आरोग्य व वातावरणीय बदल यासंदर्भातील टास्क फोर्सच्या बैठकीत जिल्हाधिकारी देसाई यांनी कृती आराखडा बनवण्यासाठी समिती स्थापन केली. प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी नोडल अधिकारी तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक आणि वनाधिकारी यांचा टास्क फोर्स तयार करण्याचे निर्देश दिले.
जिल्ह्यात पर्यावरण कक्ष स्थापन करावा, त्यामध्ये सर्वेक्षण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, साथरोगतज्ञ, डाटा एंट्री ऑपरेटर असावा, असा निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकाऱयांनी साथरोगाचा आढावा घेतला. डेंग्यू नियंत्रणासाठी तीव्र जोखमीच्या गावांचा शोध घ्यावा, तेथे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची सुचना केली.
जिल्ह्यात श्वानदंशाच्या घटना वाढत आहेत, त्याच्या नियंत्रणासाठी नॅशनल ऍक्शन प्लॅन फॉर इलिमेंनेशन ऑफ डॉग मेडीटेड रेबीज इन इंडिया (नापरे) संस्थेच्या सुचनेनुसार 2030 पर्यत रेबीज निर्मुलनाचा कृती आराखडा तयार करा, अँटी रेंबीज क्लिनिक मॉडेल स्थापन करा, रेबीज मृत्tयदर कमी करण्यासाटी जोखीमग्रस्त गटात लसीकरण करा जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर भटका कुत्र्यांचे लसीकरण, नसबंदी करा, अशाही सुचना त्यांनी केल्या.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी टास्क फोर्समध्ये पर्यावरणतज्ञांचा समावेश करण्याची सुचना केली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. येगेश साळे यांनी स्वागत केले. जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. उषा कुंभार यांनी टास्क फोर्सच्या उद्दिष्टांची माहिती दिली. बैठकीला जिल्हा साथरोग तज्ञ डॉ. संतोष तावशी, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद मोरे, डॉ. अनिता सैबन्नावर, डॉ. विजय कुलकर्णी, विजय पाटील, प्रतीक्षा लोळगे, के. एस. खतीब, प्रशांत संकपाळ, जिल्हा कृषी अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, सपना घुणकीकर, रूपाली पवार, प्रवीण पवार, डॉ. विनोद पवार, डॉ. शुभांगी रेंदाळकर, डॉ. सॅम रूद्रीक उपस्थित होते.