राहुल गांधींची केंद्रावर टीका
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगाला केंद्र सरकारने रोख रक्कम देण्यास नकार दिला आहे. या निर्णयामुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होणार आहे, अशा शब्दात ट्विटरच्या माध्यमातून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी शनिवारी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
राहुल गांधी यांनी एका लेखाच्या माध्यमातून लॉकडाऊन (टाळेबंदी) निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामाची चर्चा केली आहे. लॉकडाऊनचा निर्णय हा नोटाबंदीचा भाग 2 आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. मागील काही दिवस लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेले आणि सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगाला केंद्र सरकारने थेट आर्थिक मदत द्यावी. नागरिकांच्या बँक खात्यात सरकारने साडेसात ते दहा हजारपर्यंतचे थेट मदत द्यावी, अशी मागणी राहुल गांधी करीत आहेत.