वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
कोरोनाच्या संकटातून सावरण्यासाठी सरकार आता काही प्रमाणात लॉकडाऊन शिथिल करण्यावर विचार करत आहे. चामडे निर्यातदारांनी येत्या 3 मे च्या लॉकडाऊनमधून या उद्योगाला बाहेर काढण्याची विनंती केली आहे. जर का याबाबत कोणताही सकारात्मक निर्णय न घेतल्यास येत्या काळात या उद्योगाला चीन आणि व्हिएतनाम यासारख्या देशाकडून मिळणारी ऑर्डर रद्द होण्याचे संकेत आहेत.
कोरोनाच्या संकटामुळे चालू वर्षातील मार्चपर्यंत चामडय़ाची निर्यात जवळपास 32 टक्क्मयांनी घसरली आहे तर एप्रिलमध्ये पाच ते दहा टक्के निर्यात होण्याची अपेक्षा आहे. येत्या मे व जून या महिन्यात ही निर्यात 50 टक्क्मयांवर जाण्याचा अंदाज असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे आम्हाला कोणत्याही स्थितीत यातून दिलासा द्यावा कारण चीन, व्हिएतनाम आणि बांगलादेश हे पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. असे असल्याने आपल्यालाच मोठे नुकसान सहन करावे लागण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
ऑर्डर रद्द
चर्म निर्यात परिषदेचे अध्यक्ष अकील अहमद पनरुमा यांनी 17 मार्चनंतर जवळपास 7,600 कोटी रुपयांची ऑर्डर रद्द झाल्याचे म्हटले आहे.