तब्बल 55 दिवसांनी बससेवा सुरू, मध्यवर्ती बसस्थानक मंगळवारी पुन्हा गजबजले,
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बंद करण्यात आलेली बस वाहतूक अखेर मंगळवारी सुरू करण्यात आली. तब्बल 55 दिवसांनी बससेवा सुरू करण्यात आली. राज्यातील विविध शहरांबरोबरच शहर व तालुक्मयातीलही सेवा सुरू करण्यात आली आहे. सरकारने घातलेले नियम पाळून बससेवा सुरू झाली. पहिल्या दिवशी तितकासा प्रतिसाद मिळाला नसला तरी बससेवा सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर सर्व बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर प्रथमच मंगळवारी बससेवा सुरू करण्यात आली. दिवसभरात 252 फेऱया सुरू करण्यात आल्या. प्रत्येक बसचे सॅनिटेशन करण्यात आले होते. चालकांना मास्क, हॅण्डग्लोज, सॅनिटायझर देण्यात आले होते. सकाळी 7 ते सायंकाळी 7 यावेळेत या बसेस विविध मार्गांवर धावत होत्या. अनेक दिवसांपासून ठप्प असलेले बेळगावचे मध्यवर्ती बसस्थानक मंगळवारी पुन्हा गजबजले.
नाव-मोबाईल क्रमांकाची नोंदणी
बसस्थानकामध्ये अनेक जिल्हय़ामधून नागरिक येणार असल्याने हे धोक्मयाचे आहे. त्यामुळे एखादा संशयित किंवा कोरोनाबाधित व्यक्तीने प्रवास केल्यास त्याच्यासोबत प्रवास करणाऱयांची माहिती मिळाली, यासाठी तिकिट देण्यापूर्वी व्यक्तीचे नाव व मोबाईल क्रमांक घेण्यात येत आहे. त्यामुळे वाहकांच्या कामात वाढ झाली आहे. ती माहिती प्रत्येक दिवशी डेपो मॅनेजरकडे जमा करावी लागणार आहे.
पहिली बस बेंगळूरला रवाना
मंगळवारी सकाळी मध्यवर्ती बसस्थानकातून पहिली बस 30 प्रवाशांना घेवून बेंगळूरला रवाना झाली. बेळगावचे विभागीय नियंत्रक महादेवप्पा मुंजी यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर ही बस रवाना झाली. त्यानंतर विजापूर, हुबळी, कारवार या भागातही बस सुरू करण्यात आल्या आहेत. परगावच्या बसबरोबरच शहरांतर्गत व ग्रामीण भागातील बससेवा सुरू करण्यात आली.
प्रवासी संख्येमुळे विलंब
वायव्य परिवहन मंडळाने बस सुरू केली असली तरी नागरिकांच्या मनात अद्यापही कोरोनाची धास्ती आहे. यामुळेच नागरिकांचा पहिल्या दिवशी अल्पप्रतिसाद दिसून आला. प्रवाशीच नसल्याने बस सोडण्यात विलंब होत होता. जिल्हय़ाबाहेरील व शहरी बससेवेला प्रवासी नसल्याचा फटका बसला. परंतु येत्या दोन दिवसांत प्रवासी वाहतूक पुन्हा सुरळीत होण्याचा विश्वास चालक व वाहकांमधून व्यक्त करण्यात येत होता.
252 बसेस सोडण्यात आल्या : महादेवप्पा मुंजी (विभागीय नियंत्रक, बेळगाव)
मंगळवारपासून बससेवेला प्रारंभ करण्यात आला. पहिल्या दिवशी 252 बसेस जिल्हय़ातंर्गत व जिल्हय़ाबाहेर सोडण्यात आल्या. 65 वर्षांवरील वृद्ध व 10 वर्षाखालील बालकांना प्रवेशबंद आहे. शहरात बसमध्ये 20 तर बाहेरगावच्या बसमध्ये 30 प्रवाशांची मर्यादा ठेवण्यात आल्याचे मुंजी यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले.
प्रशासनाने चोख व्यवस्था : प्रदीप हुलबत्ते (प्रवासी)
कामानिमित्त हुबळीला जायचे असल्याने सकाळीच बसस्थानकात आलो. येथील प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बस सुरू झाली याचे मोठे समाधान आहे. प्रवासी भरल्याशिवाय बस सोडली जात नसल्याने काहीसा विलंब लागत असल्याचे त्यांनी सांगितले.