सातारा
पालिकेचा वृक्ष विभाग म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या असा प्रकार आहे. लॉकडाऊन शहरात सुरू असताना शुक्रवार पेठेतल्या बदामी विहीर परिसरात झाडे तोडण्याचे कार्य बेमालूमपणे सुरू होते. यावरून पालिकेच्या वृक्ष विभागाचे नियमतोड काम असल्याचे पितळ उघडे पडले आहे.
सातारा शहरात वृक्ष तोडीला लगाम लागावा शहर हरित व्हावे, यासाठी पालिकेत वृक्ष कमिटी स्थापन आहे. या कमिटीच्यावतीने फक्त झाडे तोडण्याची परवानगी दिली जात असल्याचा वारंवार पर्यावरण प्रेमींचा आरोप होत आहे. लॉक डाऊनच्या काळात शहरात अनेक ठिकाणी वृक्ष तोड होत आहे. पालिकेच्या वृक्ष विभागाचा याकडे कानाडोळा होत आहे. शुक्रवार पेठेतील वृक्षतोडीला कोणाचे आशीर्वाद आहेत अशी चर्चा सुरु आहेत.