कणकवली / प्रतिनिधी-
जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत तालुक्यातील वागदे – कसवण – तळवडे रस्ता खचला . रस्त्याच्या मधोमध चार फूट खोल भागच खाली गेल्याने रस्ता वाहतुकीस बंद झाला. पाऊस कमी होताच सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरत्या स्वरुपाचा रस्ता केला. मात्र, यावरून लहान वाहने जात असून हा रस्ता एसटी वाहतूक बंद असल्यामुळे त्या पंचक्रोशीतील लोकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याप्रकरणी उपअभियंता व कनिष्ठ अभियंत्यांसोबत पाहणी करून तातडीने कार्यवाहीची मागणी केली. त्यानुसार पुढील आठ दिवसांत रस्ता एसटी वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात येईल, असे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी दिल्याची माहिती राष्ट्रवादी नेते व नगरसेवक अबिद नाईक यांनी दिली.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विनायक जोशी व कनिष्ठ अभियंता राहूल पवार यांच्यासमवेत नगरसेवक अबिद नाईक यांनी भूस्खलन झालेल्या रस्त्याची पाहणी केली. यावेळी आठ दिवसात एसटी वाहतुकीला रस्ता मोकळा झाला पाहिजे त्यासाठी लागणारी सर्व मदत आपण करू, असे अबिद नाईक यांनी सांगितले. मागील दोन वर्षापासून रस्ता खचण्याचा प्रकार चालू असून त्यावर बांधकाम विभागाने लक्ष देणे गरजेचे होते, हे सबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. नाईक यांच्यासोबत यावेळी राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष विलास गावकर , माजी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत कसवण सरपंच गीता तेली, राष्ट्रवादी जिल्हा ग्राहक संरक्षणचे माजी अध्यक्ष दिलीप वर्णे शिवडाव माजी उपसरपंच सतीश पाताडे, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष इम्रान शेख सचिन सदडेकर, शहर उपाध्यक्ष अमित केतकर, शहर सरचिटणीस गणेश चौगुले, विशाल ठाणेकर, राजू वर्दम, बाळू मेस्त्री, अंकुश मेस्त्री, अरविंद पालव, बाबी गावकर, महेंद्र गावकर आदी उपस्थित होते.