प्रतिनिधी / पणजी
वाढत्या महागाईने सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडले असून भाजपा सराकार त्याचा आनंद लुटत असल्याची टीका सुदीप ताम्हणकर यांनी केली आहे. राज्यात नव्याने सरकार स्थापन केलेल्या भाजपाला 20 जागा मिळाल्या आहेत. अपक्ष तीन आणि मगोचे दोन आमदारांच्या जोरावर भाजपने सरकार स्थापन केले आहे. अपक्ष आणि मगोने पाठींबा काढल्यास भाजपाचे सरकार कोसळणार आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल. जनतेला महागाईच्या दरीत लोटणाऱया सरकारापेक्षा राष्ट्रपती राजवट परवडेला असेही ताम्हणकर यांनी सांगितले.
येथील आझाद मैदानावर काल गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परीषेदेत बस मालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर बोलत होते. डिजेल पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. अत्यआवश्य वस्तूंचे दरही दिवसेंदिवस वाढतच आहेत. अशा स्थितीत सामान्य लोकांनी जगावे कसे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मंत्री मजा लुटत आहेत तर सामान्य जनता महागाईला तोंड देत दिवस ढकलत आहे. असेही ताम्हणकर यांनी सांगितले. भाजप सरकारने टॅक्सींसाठी मिटर सक्तीचे केले खरे मात्र त्यासाठी अनुदान देण्याबा