संजीव खाडे / कोल्हापूर
तीन चार वर्षांपूर्वी सादर करण्यात आलेला कोल्हापूर जिल्ह्याचा प्रादेशिक आराखडा प्रचंड चुका, त्रुटी आणि हरकतींच्या पावसामुळे वादग्रस्त ठरला होता. आराखडा तयार करणारा नगररचना विभागाचा तत्कालिन उपसंचालक दर्जाचा अधिकारी त्याच्या कार्यपद्धतीने टीकेचा आणि वादाचा विषय ठरला होता. त्या उपसंचालकाने आता कोल्हापुरात पोस्टींग मिळावी, यासाठी मंत्रालयातून फिल्डिंग लावली आहे. त्यासाठी एका मंत्र्यालाही साकडे घातले आहे. त्याचबरोबर महापालिकेतील माजी पदाधिकाऱयाचे नातेवाईकही त्याच्या मदतीला धावून गेले असल्याची चर्चा आहे.
कोल्हापूर शहर विकास आराखडÎासाठी गेल्या शुक्रवारी नगरविकास विभागाकडून विशेष उपसंचालकाची नियुक्ती झाल्यानंतरही या पोस्टवर वर्णी लावण्यासाठी तो वादग्रस्त उपसंचालक प्रयत्नशिल असून नगरविकास विभागापासून त्याने संपर्क सुरू केला आहे.
कोल्हापूर जिल्हÎाचा प्रादेशिक विकास आराखडा 2016-2017 या वर्षी सादर झाला होता. तो आराखडा तयार करताना प्रचंड गोंधळ झाला होता. नदी, घरे, पुल असलेल्या जागांवर आरक्षणे टाकण्यात आली होती. काही गावात तर विहिर असलेल्या जागेतून रस्त्याचे आरक्षण टाकण्यात आले होते. प्रारूप आराखडा सादर झाल्यानंतर त्यावर मागविण्यात आलेल्या हरकती, सूचना आणि तक्रारीतून चुकीच्या आरक्षणाचे प्रकार पुढे आले होते. विशेष म्हणजे हजारो हरकती आल्या होत्या. हरकतींचा अक्षरशः पाऊस पडला होता. अंतिम आराखडा तयार केल्यानंतरही नागरिकांनी चुकांची दुरूस्ती झाली नसल्याचा गंभीर आरोप त्या उपसंचालकावर केला होता. जिल्हाधिकारी कार्यालयात तत्कालिन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तत्कालिन आमदार चंद्रदीप नरके यांनी आराखडा सदोष असल्याचा आक्षेप घेत आराखडÎाची प्रत फाडून टाकली होती. ग्रामीण भागातील नागरिकांवर अन्याय करणारा आराखडा असल्याचे सांगत तो आपल्याला मान्य नाही, असे सांगत नरके यांनी थेट त्या उपसंचालकाच्या कार्यपद्धतीवर आरोप केले होते.
पुढे विकास आराखडा राज्यशासनाकडे पाठविल्यानंतर त्या उपसंचालकाची नांदेडला बदली झाली. सध्या तो नांदेड महापालिकेच्या शहर विकास आराखडÎाचे काम करत आहे. ते अद्याप पूर्णही झालेले नाही. तरीही त्याने कोल्हापुरात येण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान, कोल्हापूरच्या शासकीय आणि रिअल इस्टेट वर्तुळात त्या उपसंचालकांकडून कोल्हापुरातील पोस्टींगसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची चर्चा रंगली आहे. ज्या अधिकाऱयाने जिल्हÎाच्या प्रादेशिक विकास आराखडÎात प्रचंड गोंधळ घातला. त्याला पुन्हा कोल्हापूर शहराच्या विकास आराखडÎाच्या कामासाठी विशेष अधिकारी म्हणून आणण्यासाठी काही स्थानिकही प्रयत्न करत आहेत. त्यात महापालिकेतील सत्तेत मोठे पद भोगलेल्या पदाधिकाऱयांच्या नातेवाईकांचाही समावेश असल्याची चर्चा आहे.
पाचहजार हरकती, नरकेंचा आक्षेप आणि मुख्यमंत्र्यांची स्थागिती
कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रादेशिक विकास आराखड्यातील चुका, त्रुटींवर आक्षेप घेणाऱया तब्बल पाचहजार हरकती आल्या होत्या. त्यावर नगररचना विभाग आणि उपसंचालक योग्य ते उत्तर देऊ शकले नव्हते. त्यावर हरकतदार ग्रामीण नागरिक, शेतकऱयांच्या वतीने तत्कालिन आमदार चंद्रदीप नरके यांनी आक्षेप घेत थेट तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हरकतींवर सुनावणी होईपर्यंत आराखडा प्रसिद्ध करण्यास स्थगिती आणली होती. पाच हजार हरकतींच्या सुनावणीचे काय झाले? याचे उत्तर अद्याप अस्पष्ट आहे.
त्या उपसंचालकाला कोल्हापुरात आणण्यासाठी सुपारी कुणाकडे?
कोल्हापूर शहराच्या नवीन शहर विकास आराखडÎात विविध ठिकाणी आवश्यकतेनुसार नवीन आरक्षणे टाकण्यात येणार आहे. खासगी जागांवर आरक्षण टाकून नंतर ती हटविण्यासाठी अर्थपूर्ण व्यवहार करण्यासाठी काही जण कार्यरत झाले आहेत. त्यांच्याकडून सुपारी घेऊन आपल्या सोयीचा अधिकारी आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचीही चर्चा आहे.