भाजीपाल्यांसह इतर पिकांचीही हानी, जोरदार वाऱयामुळे घरांवरील पत्रे उडाले, झाडे कोसळल्याने वीजपुरवठय़ावर परिणाम
प्रतिनिधी / बेळगाव
अरबी समुद्रामध्ये तौक्ते हे चक्रीवादळ निर्माण झाले. त्यामुळे कर्नाटकासह बेळगावातही पाऊस कोसळणार, असे हवामान खात्याने स्पष्ट केले होते. त्यानुसार बेळगाव परिसरातही जोरदार वाऱयासह पावसाचे आगमन झाले. रविवारी दिवसभर संततधार पाऊस पडत होता. त्यामुळे सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत बेळगावमध्ये 35.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच या वादळी पावसामुळे शेतकऱयांची सर्व कामे खोळंबली आहेत. भाजीपाल्यांसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या वळीव पावसामुळे शेतकऱयांना पुन्हा फटका बसला असून बळीराजा हतबल झाला आहे.
कोरोनासारख्या संकटाचा सामना करत असताना या पावसानेही अधिकच परिस्थिती गंभीर बनविली आहे. खनगाव केएचसह इतर गावांतील अनेक घरांवरील पत्रे उडून जाण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. भाजीपाला कुजून गेला आहे. एकतर कोरोनामुळे भाजी विक्री करणे अवघड झाले असताना पुन्हा पावसाचा दणका शेतकऱयांना सहन करावा लागला आहे.
शनिवारी रात्रीपासूनच काही ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित
जोरदार वाऱयामुळे अनेक ठिकाणची झाडे उन्मळून पडली. अनेक ठिकाणच्या झाडांच्या फांद्या विद्युततारांवर तसेच घरांवर कोसळून हेस्कॉम आणि सर्वसामान्य जनतेचेही मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शहरासह ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता. शनिवारी रात्रीपासूनच काही ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. रविवारी दिवसभर तर अनेक गावे अंधारातच होती. या पावसामुळे कोविड सेंटरनाही फटका बसला आहे. कारण अनेक ठिकाणी गळती लागल्या तर हवा गार सुटल्यामुळे रुग्णांना त्याचा त्रास सहन करावा लागला आहे.
संततधार पावसामुळे शहरातील सखल भागामध्ये पाणीच पाणी झाले होते. अनेक ठिकाणी पाणी साचले होते. गटारी तुडूंब भरून वाहताना दिसत होत्या. रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे अनेकांना त्यामधून वाट काढत पुढे जावे लागत होते. सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यामुळे या पावसाचा बाजारपेठेवर म्हणावा तसा परिणाम झाला नसला तरी भाजी विपेते आणि फळविपेत्यांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे.
उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचून होते. पहिला मोठा पाऊस असल्यामुळे गटारींमध्ये कचरा साचून पाणी रस्त्यांवरून वाहत होते. त्यामुळे गटारी साफ करण्यासाठी अनेकांची धडपड सुरू होती. नेहमीप्रमाणे गांधीनगर येथे भुयारी मार्गामध्ये यावेळी पाणी साचले होते. त्याचबरोबर अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचून होते. पावसाची संततधार थांबून थांबून येत होती. त्यामुळे साचलेले पाणी निचरा होऊन जात असतानाच पुन्हा पाऊस झाल्यामुळे पाणी साचून राहत होते.
पावसामुळे भाजी पूर्णपणे गेली भिजून
बेळगाव येथून गोवा तसेच महाराष्ट्रामध्ये मोठय़ा प्रमाणात भाजी पाठविली जाते. मात्र, या पावसामुळे भाजी पूर्णपणे भिजून गेली. ती भाजी ट्रक आणि इतर वाहनांमध्ये भरताना हमाल व व्यावसायिकांना मोठी कसरत करावी लागत होती. अनेक वेळा पाय घसरून पडण्याच्या घटना घडल्या. दुकानगाळय़ांसमोरच गुडघाभर पाणी साचल्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली. या समस्यांमुळे व्यापारीवर्गाने आम्हाला एपीएमसीमध्येच व्यवसाय करण्यास मुभा द्यावी, अशा प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केल्या.
या पावसामुळे टोमॅटो ट्रे चा दर 60 रुपये झाला. कोथिंबिरीचा दरही गडगडला. इतर भाजीपाल्यांचे दरही कमी झाल्यामुळे शेतकऱयांना याचा सर्वात जास्त फटका बसला आहे. कोरोना आणि पाऊस या दुहेरी संकटामध्ये व्यापारीवर्ग आणि शेतकरी अडकल्याचे दिसून आले.
सीपीएड मैदानावरील भाजी मार्केटला फटका
कोरोनामुळे सीपीएड मैदानावर तात्पुरते भाजीमार्केट सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी कोणतीही सोय नसल्यामुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले होते. प्रत्येक गाळय़ामध्ये पावसाचे पाणी जाऊन भाजीचे मोठे नुकसान झाले. या पावसामुळे खरेदीदारांनी पाठ फिरविली तर शेतकरी मात्र भाजी विक्री करण्यासाठी धडपडताना दिसत होते. पावसामुळे भाज्यांचे दर गडगडले होते. एकतर या ठिकाणी कोणतीच सुविधा नाही, त्यातच हा पाऊस यामुळे व्यापारीवर्गातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.