प्रतिनिधी / रत्नागिरी
वाशीतील एपीएमसी फळबाजारामध्ये हापूसची आवक वाढली असून मंगळवारपर्यंत रत्नागिरी व सिंधुदुर्गातून 23 ते 24 हजार पेटय़ांची आवक झाल्याचे सांगण्यात आल़े हापूसच्या आवक झाल्यामुळे पेटीचा दरही कमी होणार आह़े
उष्मा वाढत असल्याने हापूस तयार होत आह़े त्यामुळे बागायतदारांनी तयार हापूसची तोडणी सुरु केली आह़े मागील आठवडय़ामध्ये फळबाजारात 7 ते 8 हजार पेटय़ांची आवक झाली होत़ी मंगळवारपर्यंत हापूसची आवक ही 24 हजारांपर्यंत गेली आह़े बाजारात दाखल होणाऱया पेटय़ा या 4 ते 6 डझनच्या असून पेटीला 2 ते 4 हजार रुपयांचा भाव मिळत आह़े गतवर्षी कोरोनामुळे मार्च महिन्यामध्ये वाशीच्या फळबाजारात केवळ 5 ते 6 हजार पेटय़ांची आवक झाली होत़ी यंदा मात्र दिलासादायक चित्र आह़े हापूसची आवक मोठय़ा प्रमाणात होत असली तरी कर्नाटकातील आंब्याचीही तेवढय़ाच प्रमाणात आवक होत असून काही व्यापाऱयांकडून कर्नाटक आंब्याची हापूस म्हणून विक्री केली जात आह़े त्यामुळे हापूस सारखाच दिसणारा पण चव वेगळी असणारा या कर्नाटकातील आंब्याच्या नावाखाली काही व्यापाऱयांकडून ग्राहकांची फसवणूक होत आहे. या विरोधात आवाज उठवण्याचा निर्णय कोकणातील हापूस बागायतदार व व्यापाऱयांनी घेतला आह़े