शहराचा पाणीपुरवठा ठप्प, व्हॉल्व पाण्याच्या दाबामुळे खराब झाल्याने लागली गळती, पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता
प्रतिनिधी /बेळगाव
हिंडलगा पंपिंग स्टेशनमधून लक्ष्मी टेकडी जलशुद्धीकरण केंद्रात पाणीपुरवठा करणाऱया जलवाहिनीला विजयनगर येथे मोठय़ा प्रमाणात गळती लागली. सोमवारी मध्यरात्री सव्वा एक वाजता गळती लागल्याने मोठय़ा प्रमाणात पाणी वाया गेले. लक्ष्मी टेकडी जलशुद्धीकरण केंद्राला होणारा पाणीपुरवठा बंद झाला असल्याने शहर परिसरात पाणीटंचाई निर्माण होणार आहे.
हिंडलगा पंपिंग स्टेशनमधून लक्ष्मी टेकडी येथे सहाशे अश्वशक्तीच्या विद्युत पंपाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पण विजयनगर येथे जलवाहिनी वारंवार फुटण्याचे प्रकार घडत आहेत. सोमवारी रात्री पाणीपुरवठा सुरू असताना विजयनगर साई मंदिरसमोर जलवाहिनीला गळती लागली. तसेच मोठा आवाज आला परिसरातील नागरिकांनी उठून पाहिले असता जलवाहिनीला गळती लागल्याचे आढळून आले. यामुळे त्यांनी पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पंपिंग स्टेशनमधून पाणीपुरवठा बंद करण्यात आला. मात्र गळतीमुळे मोठय़ा प्रमाणात पाणी वाया गेले. हिंडलगा पंपिंग स्टेशनमधील कामगारांनी पाहणी केली असता याठिकाणी असलेले व्हॉल्व पाण्याच्या दाबामुळे खराब झाल्याने गळती लागल्याचे निदर्शनास आले. हिंडलगा पंपिंग स्टेशन ते लक्ष्मी टेकडी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतचे अंतर तीन किलोमीटर असून विजयनगर येथे मोठी चढती आहे. त्यामुळे पंप बंद झाल्यानंतर मोठय़ा आकाराच्या जलवाहिनीमधील पाणी पुन्हा पंपिंग स्टेशनमध्ये माघारी जाते. पंप पुन्हा सुरू केल्यानंतर जलवाहिनी भरण्यासाठी तीन ते चार तासाचा अवधी लागतो. त्यामुळे ठिकठिकाणी व्हॉल्व बसविण्यात आले आहेत. तसेच विजयनगर बसथांब्याजवळ जलवाहिनीला व्हॉल्व बसविण्यात आला होता. सदर व्हॉल्ववर पाण्याचा दाब वाढल्याने तो खराब झाल्याने गळती लागल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
दुपारनंतर दुरूस्तीचे काम सुरू
पाणीपुरवठा नियोजनाची जबाबदारी एलऍण्डटी कंपनीकडे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे कंपनीच्या अधिकाऱयांनी पाहणी करून दुरूस्तीचे काम हाती घेतले. खराब झालेले व्हॉल्व बदलण्याचे काम हाती घेण्यात आले होते. पाणीपुरवठा व देखभालीचे काम अलिकडेच घेण्यात आले असल्याने आवश्यक साहित्य आणि मनुष्यबळ उपलब्ध नाही. त्यामुळे दुरूस्तीसाठी दुपारपर्यंत कोणत्याच हालचाली चालविल्या नव्हत्या. पण दुपारनंतर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. नवीन व्हॉल्व बसविण्यात येणार असल्याने बुधवारपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होण्याची शक्मयता आहे.
आज शहराच्या पाणीपुरवठय़ात व्यत्यय
लक्ष्मी टेकडी जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करण्यात येणाऱया हिंडलगा पंपिंग स्टेशनच्या जलवाहिनीला गळती लागली आहे. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून अचानक लागलेल्या गळतीमुळे पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. परिणामी शहरातील 24 तास पाणीपुरवठा योजनेसह शहराच्या पाणीपुरवठय़ात बुधवार दि. 14 रोजी व्यत्यय निर्माण होणार आहे. हिडकल जलाशयामधून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, पण नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध होणार नाही. त्यामुळे शहरवासियांनी सहकार्य करावे, असे आवाहन एलऍण्डटी कंपनीच्यावतीने करण्यात आले आहे.