मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आव्हान
प्रतिनिधी / मडगाव
गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई व त्यांच्या नगरसेवकांनी मागच्या व त्यापूर्वीच्या नगरपालिका निवडणुकीत आपल्या जाहीरनाम्यातून जनतेला अनेक आश्वासने दिली होती. या आश्वासनाची त्यांनी का पूर्तता केली नाही. त्यांनी जनतेला का खोटी आश्वासने दिली होती हे अगोदर स्पष्ट करावे असे जाहीर आव्हान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहे. सोमवारी रात्री मुख्यमंत्री डॉ. सावंत व्हायब्रंट मडगाव पॅनलचे उमेदवार सदानंद उर्फ पाकलो नाईक यांच्या कोपरा बैठकीत बोलत होते.
विजय सरदेसाई यांनी दरवेळी जनतेची दिशाभूलच केली आहे. मग ती निवडणूक नगरपालिकेची असो किंवा विधानसभेची. जनतेला खोटय़ा थापा मारून ते विजयी होत असतात आणि नंतर त्यांना जनतेला दिलेल्या आश्वासनाचा विसर पडत असतो. मात्र, यावेळी फातोडर्य़ातील मतदार त्यांच्या या खोटय़ा आश्वासनाला बळी पडणार नाही असे मुख्यमंत्री या प्रसंगी पुढे बोलताना म्हणाले.
व्हायब्रंट मडगाव पॅनलच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले. सोनसोडय़ावरील कचऱयाचा प्रश्न सोडवितानाच, मडगाव बस स्थानक तसेच पार्किग कॉमप्लेक्स मार्गी लावला जाईल तसेच फातोडर्य़ातील सर्व विकासकामांना चालना दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आम्ही जनतेला केवळ आश्वासने देत नाही तर त्या आश्वासनाची पूर्तता करतो असे मुख्यमंत्री म्हणाले.
आज विकासकामांबरोबरच फातोडर्य़ातील जनतेचा सर्वागिण विकास साध्य करायचा आहे. त्यासाठी मतदारांनी गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई देत असलेल्या खोटय़ा आश्वासनाला बळी न पडता, व्हायब्रंट मडगावच्या पॅनलच्या उमेदवारांना एक संधी देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
घोगळ-मडगाव येथील परेरा एनक्लेव कॉमप्लेक्स मध्ये ही कोपरा बैठक घेण्यात आली. या कोपरा बैठकीला प्रभाग 6चे उमेदवार सदानंद उर्फ पाकलो नाईक, माजी आमदार दामू नाईक, सौ. बबिता नाईक, फातोर्डा भाजप मंडळाचे अध्यक्ष मनोहर बोरकर व इतरांची उपस्थिती होती.
दामू नाईक यांनी विजय सरदेसाई यांच्यावर घणाघातकी टीका केली. विजय सरदेसाई भाजप सरकारात मंत्री होते. ते उपमुख्यमंत्री झाले. मात्र, फातोडर्य़ासाठी त्यांना एकही प्रकल्प आपणणे शक्य झाले नाही. उलट त्यांनी स्वताच स्वार्थ साधला. फातोडर्य़ात गोवा फॉरवर्डचे भव्य कार्यालय, पणजीत कार्यालय तसेच नेत्रावळी येथे आलिशान प्रकल्प उभारल्याचे श्री. नाईक म्हणाले. फातोडर्य़ातील युवकांना नोकऱया देण्यातही त्यांना अपयश आले. या विषयावर आपण त्यांना आमने-सामने चर्चा करण्याचे जाहीर आव्हान देतो. त्यांनी ते स्वीकारवे असे श्री. नाईक म्हणाले.
विजय सरदेसाई यांनी फातोडर्य़ातील जनतेकडे फट, फटींग, फटींगपणा केल्याचा आरोप यावेळी दामू नाईक यांनी केला. दर वेळी लोकांना फसविणे शक्य नसते. आत्ता फातोडर्य़ातील जनतेने सरदेसाई यांचे कारनामे ओळखले असून त्यांना मतदार धडा शिकवतील.