वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गेल्या काही आठवडय़ापासून विजेच्या मागणीत सातत्याने वाढ होताना दिसते आहे. 20 जानेवारी रोजी 1 लाख 87 हजार 820 मेगावॅट विजेची मागणी नोंदवण्यात आली होती. मागणीचा विचार करता हा एक विक्रम मानला जात आहे.
याच कालावधीत मागच्या वर्षी 1 लाख 85 हजार 820 मेगावॅटची मागणी नोंदवली होती. भारतात कोळशावर आधारित ऊर्जा उत्पादनामध्ये चांगली वाढ झाली आहे. 205 गिगावॅटच्या क्षमतेच्या तुलनेमध्ये 141 गिगावॅटचे उत्पादन 30 डिसेंबर रोजी आजपर्यंतचे सर्वाधिक घेण्यात आले. कोरोनाच्या लॉकडाऊन काळात बंद असलेले कारखाने, उद्योगव्यवसाय पुन्हा पूर्ववत झाल्याने विजेची मागणी वाढली आहे. अर्थव्यवस्था रुळावर आल्याचे हे लक्षण असल्याचे ऊर्जा मंत्रालयाकडून सांगण्यात आले. एकंदरच देशभरातील विजेची मागणी बऱयापैकी वाढली आहे.