केंद्र सरकारने केली आंग्रियाची निवड : सज्ज राहण्याचा आदेश : गोव्याला मिळाला बहुमान : आठ हजार गोमंतकीयांना आणणार
प्रतिनिधी / पणजी
भारतातील पहिली मुंबई – गोवा दरम्यान प्रवाशी वाहतूक करणारी बोट कंपनी तथा प्रुज आंग्रियाची निवड केंद्र सरकारने कोरोना लॉकडाऊनमुळे विदेशांमध्ये अडकलेल्या भारतीय-गोमंतकीयांना खलाशांना पुन्हा भारतात आणण्यासाठी निवड केली आहे. विशेषतः विदेशात जे सुमारे 8 हजार गोमंतकीय खलाशी अनेक जहाजांवर अडकले आहेत, त्यांना गोव्यात आणण्यासाठी आंग्रियाला नियुक्त केले आहे. हे जहाज लवकरच मुंबई बंदारातून विदेशात प्रयाण करणार आहे.
आंग्रियाच्या सी ईगल प्रा. लि. या बोट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन नितिन धोंड हे गोमंतकीय आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली हे जहाज गेले कित्येक महिने गोवा ते मुंबई व परत अशी प्रुज बोट सेवा पर्यटकांसाठी बजावित आहे.
आठ हजार गोमंतकीय खलाशी अडकून
कोरोनामुळे जगभरात सर्वच राष्ट्रांनी लॉकडाऊन सुरू केल्यानंतर सुमारे 15 हजार भारतीय खलाशी जगातील विविध जहाजांवर अडकून पडलेले आहेत. त्यातील सुमारे 8 हजार हे गोमंतकीय आहेत. त्यांना गोव्यात परत आणण्यासाठी गोवा सरकारने केंद्र सरकारच्या दरबारी प्रयत्न केले आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक या दोघाही नेत्यांनी राष्ट्रीय पातळीवर जोरदार प्रयत्न केले असता दोघांनाही यश आले आहे.
आम्हाला ही देशसेवेची संधी : कॅप्टन धोंड
कॅप्टन नितिन धोंड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर वृत्तास दुजोरा दिला. ते म्हणाले की आमच्या हातून ही देशसेवा होत आहे आणि त्यासाठी कोणत्याही आव्हांनाला सामोरे जाण्यास आम्ही तयार आहोत. केंद्र सरकारने त्याकरिता आमच्या जहाजाची निवड केलेली आहे. केंद्राचा पुढील आदेश निघताच जहाज घेऊन आम्हाला पुढे जायचे आहे. या जहाजावर सुमारे 20 पेक्षाही जास्त गोमंतकीय खलाशी आहेत. गेले काही दिवस हे जहाज लॉकडाऊनमुळे मुंबईच्या बंदरात थांबून होते. तेथून या जहाजावरील कर्मचाऱयांना गोव्यात आणण्यासाठी गोवा सरकारने आंिग्रयाला सहकार्य केले होते.
विदेशांत जाऊन घेऊन येणार भारतीयांना
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही स्वतः त्यात लक्ष घातले होते. आंग्रिया जहाजावरून त्या खलाशांना गोव्यात आणण्यासाठी केंद्रांकडून मान्यताही मिळविली होती. तथापि, आता हे कर्मचारी गोव्यात न परतता त्यांना थेट आंग्रिया जहाजावरूनच विदेशात जायचे आहे. तिथे अडकलेल्या गोमंतकीयांना तसेच देशातील इतर खलाशांनाही भारतात आणायचे आहे. सध्या विमानसेवा बंद असल्याने आंग्रियामार्फत एकाचवेळी सुमारे 500 ते 600 जण परत येऊ शकतात.
आंग्रिया कर्मचाऱयांनी स्वीकारली मोठी जबाबदारी
आंग्रिया जहाजावरील कर्मचारीवर्गास गोव्यात पाठविण्यास व्यवस्थापन इच्छूक नसल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेले असले तरी देखील प्रत्यक्षात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर देशातील लोकांना विदेशातून परत आणण्याची फार मोठी जबाबदारी जहाजावरील सर्वच कर्मचाऱयांनी स्वीकारलेली आहे.
जबाबदारी पार पाडण्यास सज्ज : प्रभू
आंग्रियाच्या उपाध्यक्ष लिना कामत प्रभू यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व गोवा सरकारचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला फार सहकार्य केले व त्यामुळेच जहाजावरील कर्मचाऱयांना गोव्यात परतण्याचा मार्ग मोकळा झाला होता. तथापि, आता केंद्राने जी जबाबदारी आमच्यावर दिलेली आहे ती पार पाडण्यास आम्ही सज्ज झालेलो आहोत असे त्या म्हणाले.
कॅ. नितिन धोंड यांनी सांगितले की, पहिली गोमंतकीय देशपातळीवर प्रवासी वाहतूक करणारी ही बोट कंपनी व आंतरराष्ट्रीय पातळीवर देशसेवा करण्यासाठी केंद्राने त्याकरिता नियुक्त करावे हा गोमंतकीयांसाठी बहुमान आहे. ही देशसेवा करण्यासाठी आपल्याला संधी प्राप्त झाली आहे आणि ती आपण यशस्वी पार पडू, असे ते म्हणाले.
आमच्या हातून ही देशसेवा होत आहे, त्यासाठी कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यास आम्ही तयार आहोत. केंद्र सरकारचा आदेश निघताच जहाज घेऊन पुढे जाऊन सर्व खलाशांना परत आणायचे आहे.
– कॅप्टन नितिन धोंड व्यवस्थापकीय संचालक, आंग्रिया
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व गोवा सरकारचे आम्ही आभार मानतो. त्यांनी आम्हाला फार सहकार्य केले. आता केंद्राने जी जबाबदारी आम्हाला दिलेली आहे ती पार पाडण्यास आम्ही सज्ज झालेलो आहोत.
– लिना कामत प्रभू उपाध्यक्ष, आंग्रिया